शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आयएएसच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर!

By admin | Updated: January 6, 2015 02:18 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मोठ्या प्रमाणात केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मोठ्या प्रमाणात केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काही बदल्या रद्द केल्या जातील की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नगरविकास विभागातून महसूल विभागात गेलेले मनुकुमार श्रीवास्तव (प्रधान सचिव) आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे सूर कितपत जुळतील याबाबत विभागातील काही अधिकारी खासगीत शंका घेतात. प्रत्येक बाबतीत नियमावर बोट ठेवण्याचा श्रीवास्तव यांचा स्वभाव आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नवे प्रधान सचिव (ऊर्जा) मुकेश खुल्लर यांच्याबाबतही असेच बोलले जात आहे. सतीश गवई यांना म्हाडातून आणून गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव केल्याने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता नाराज असल्याचे सांगण्यात येते. नगरविकास विभागात नितीन करीर आणि मनीषा म्हैसकर या दोन कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणून मुख्यमंत्र्यांनी चांगला संदेश दिला आहे. या खात्यात गेली काही वर्षे सोपे काम किचकट करून निर्णय लांबविण्याचा पडलेला प्रघात आता तरी मोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. महावितरणमधून पर्यावरण विभागात गेलेले अजय मेहता लवकरच प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाणार अशी चर्चा आहे. गौतम चटर्जी, देवाशिष चक्रवर्ती, अश्विनी भिडे अशा काही कार्यक्षम अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी अधिक विश्वास टाकल्याचे दिसते. तसेच मराठी अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक एस. एस. झेंडे यांना आघाडी सरकारच्या काळात बरेचवेळा ‘साईड पोस्टिंग’ दिली गेली. मात्र, भाजपा सरकारने त्यांना हाफकिन इन्स्टिट्यूटमधून उचलून म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद दिले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू मानले गेलेले श्यामसुंदर शिंदे हे अशोक चव्हाण आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातदेखील सत्ताधाऱ्यांच्या नाराजीचे लक्ष्य बनले आणि त्यांना कमी महत्त्वाच्या पदांवर राहावे लागले. आता त्यांना पशुसंवर्धन आयुक्त पदावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त या महत्त्वाच्या पदावर पाठविण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या काही अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविताना त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये, अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. अशा काही अधिकाऱ्यांना ‘क्रीम पोस्टिंग’ मिळाले असले तरी त्यांच्या कामावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धेचे उदय चौधरी यांना पाठविण्यात आले आहे. पण आधीचे कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनाच कायम ठेवावे, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि नाशिकच्या भाजपा आमदारांनीही घेतल्याने ही चौधरींची बदली रद्द होण्याची शक्यता आहे.