शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

राज यांची हाराकिरी की जुगार?

By admin | Updated: June 2, 2014 05:38 IST

मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही

ठाणे : या, मला आपल्याशी बोलायचंय, अशा भावनिक आवाहनाद्वारे विराट सभा घेऊन त्यात मी निवडणूक लढविणार अशी राज ठाकरे यांनी केलेली घोषणा म्हणजे अंतिम हाराकिरीचा जुगार आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आणि मनसेच्याच गोटात व्यक्त होत आहे. मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही. तसेच मोजके जिल्हे वगळता पक्षाचा प्रभाव नाही, कार्य नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपले संख्याबळ सध्यापेक्षा वाढविणे व कुणालाच बहुमत मिळाले नाही, तर किंगमेकरची भूमिका प्राप्त करणे त्यासाठी लागणारा चेव आणि ईर्षा कार्यकर्त्यांत निर्माण करणे एवढाच हेतू या घोषणेमागे असल्याचे जाणवते. पक्षाने उभ्या केलेल्या बहुसंख्य उमेदवारांचे डिपॉझिट लोकसभा निवडणुकीत जप्त झाले. त्यामुळे पक्षाचे मनोधैर्य खचले होते. पक्षाला जिथे जिथे सत्ता मिळाली त्या नाशिक महानगरपालिका व कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधींची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. त्यामुळे पक्षात कोणत्याच आघाडीवर समाधानकारक वातावरण नाही. राज यांची पकड संघटनेवर आहे, असेही जाणवत नाही. ज्या महापालिकेची सत्ता मनसेकडे आहे, त्या नाशिक महानगरात दरवर्षाला महानगरप्रमुख बदलण्याची वेळ राज यांच्यावर आलेली आहे. आधी नितीन भोसले, मग समीर शेटे, मग राहुल ढिकले अशी ही तिकडम नाशकात झाली आहे. विधानसभेतील गट उपनेते वसंत गीते यांच्या आग्रहाला मान देऊन महापौर दिलेल्या अ‍ॅड़ वाघ यांनी ठसा उमटवणे सोडा अस्तित्वही दाखविलेले नाही. अशीच स्थिती कल्याण-डोंबिवली व ठाणे पालिकेत आहे. ही खेळी धोकादायक आहे. कारण जर शिवसेना आणि अन्य पक्षांनी तिथे सगळी ताकद लावून राज यांचा पराभव घडविला, तर त्यातून पक्षाचे मानसिक खच्चीकरण होईल़ त्यातून पक्ष पुन्हा उभा राहणे अवघड असेल. राज यांना महायुती जवळ करणे अशक्य आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेदेखील उघड जवळ करणार नाहीत. ठाकरे घराण्याभोवतीचे जे वलय आजवर टिकून राहिले त्याचे कारण ज्या सत्तेसाठी सगळे जण साठमारी खेळतात, त्या सत्तेपासून ठाकरे कुटुंबीय सतत दूर राहत आलेले आहे. कोणतीही निवडणूक लढविणार नाही, कोणतेही सत्तापद स्वीकारणार नाही़ माझ्या दृष्टीने संघटनेचे सर्वोच्चपद हे सर्वोच्चपद आहे. अशा काहीशी नि:स्वार्थ आणि संन्यस्थ विचारांनी शिवसेनाप्रमुख आयुष्यभर वागले, म्हणून हे वलय त्यांना लाभले. परंतु त्याला ठाकरे कुटुंबाचा वारस असलेल्या राज यांनी निवडणूक लढविणार, असे घोषित करून सोडचिठ्ठी दिली आहे. मनसेतील काही सूत्र असेही सांगतात की, राज प्रत्यक्षात निवडणूक लढविणारही नाहीत़ ते सत्तेपासून दूर या राजकीय तत्त्वाशी व ठाकरे घराण्याच्या व्रताशी एकनिष्ठ राहतील़ त्यांनी केवळ पक्षात प्राण फुंकण्यासाठी निर्वाणीचा उपाय म्हणून या घोषणास्त्राचा वापर केला असावा. परंतु तसे घडले तरी राज यांच्यावर निवडणुकीच्या रणांगणातून लढण्यापूर्वीच पळ काढला, अशी टीका होऊ शकते.