शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

गाळ्यात भरते बेलपाड्याची राजिप शाळा

By admin | Updated: August 25, 2016 02:33 IST

शासनस्तरावर मराठी शाळा टिकण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.

वैभव गायकर,

पनवेल- शासनस्तरावर मराठी शाळा टिकण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र दिवसेंदिवस मराठी शाळा व त्याठिकाणची पटसंख्या कमी होत आहे. खारघरसारख्या शहरात बेलपाडा गावातील राजिप शाळा पाच महिन्यांपासून भाड्याच्या खोलीत सुरू आहे. गावात असलेल्या शाळेची मोडकळीस आलेली इमारत व ग्रामस्थांच्या आपसातील वादाचा फटका ही शाळा बंद पडण्याचे कारण ठरले आहे. याबाबत रायगड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग देखील लाचार झाला असून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. सन १९५६ साली ही शाळा सुरू झाली. याकरिता काकडे कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून दिली होती. शहरात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा सुरू झाल्या. त्याचा परिणाम मराठी शाळांच्या पटसंख्येवर झाला. बेलपाडा गावातील शाळेच्या मोडकळीस आलेल्या छपरामुळे पहिली ते पाचवी इयत्तेतील शाळा भाड्याच्या जागेत भरवावी लागली आहे. विशेष म्हणजे शाळा दुरुस्त करण्याऐवजी ग्रामपंचायत देखील पाच महिन्यांपासून या गाळ्यांचे भाडे भरत आहे. या शाळेवर दोन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हाती काहीच लागत नसल्यामुळे शिक्षक देखील हवालदिल झाले आहेत. शेकडोच्या संख्येत असलेली पटसंख्या घसरून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत येऊन ठेपली आहे. सध्या याठिकाणी केवळ ३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही संख्या देखील भविष्यात कमी होईल. भाड्याने सुरु असलेल्या जागेत मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी जागा देखील नाही. जवळच असलेल्या रस्त्यावर हे विद्यार्थी खेळत असतात. बेलपाडा गावातील राजिप शाळा बंद अवस्थेत आहे. दुरुस्तीच्या नावाने याठिकाणाहून शाळा स्थलांतरित करण्यात आली. १९५६ पासून सुरु असलेली शाळा अचानक कशी काय बंद पडू शकते. राजिप शिक्षण विभागाचे अधिकारी याठिकाणी फिरकत देखील नाहीत ही आश्चर्याची बाब आहे. यासंदर्भात खारघर ग्रामपंचायतीच्या सरपंच सिद्धी घरत यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी सांगितले की, शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ग्रामस्थांच्या विरोधामुळे शाळेच्या दुरुस्तीचे काम थांबले आहे. लवकरात लवकर हा विषय मार्गी लावला जाईल. >विशेष म्हणजे खाजगी शाळा असलेल्या कोपरा गावातील सुधागड एज्युकेशन सोसायटीची शाळा ग्रामपंचायतीने स्वखर्चाने बांधली आहे. याकरिता कोट्यवधी रु पये निधी ग्रामपंचायतीने याठिकाणी वापरला आहे. मात्र बेलपाडा गावातील शाळा दुरु स्त न करता भाड्याच्या खोलीत भरवणे हे कितपत योग्य आहे, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे >जिल्हा परिषदेची शाळा उभारणीसाठी आमची जागा दिली. मात्र याठिकाणी इमारत बांधताना ते आजतागायत आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. याठिकाणी नव्याने शाळा उभारावी तसेच आजूबाजूच्या घरांना रस्ता सोडावा व या सर्वाची माहिती आम्हाला द्यावी ही मागणी आहे. शाळेला जागा देऊनही शाळेच्या कमिटीत कुटुंबातील एकाही सदस्याला घेतले नाही. या अन्यायाविरोधात आम्ही दाद मागत आहोत. - शत्रुघ्न काकडे, ग्रामस्थ, बेलपाडा गाव, खारघर