शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात सुरक्षा दलांचा व्हावा कमी वापर - राजनाथ सिंह

By admin | Updated: June 8, 2017 18:06 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुरक्षा दलांचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी...

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 8 - शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुरक्षा दलांचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.  महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेला बळाचा वापर आणि मध्य प्रदेशात मंदासोर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आज मुंबईत हे वक्तव्य केले . 
मध्य प्रदेशात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजनाथ सिंह म्हणाले, "शेतकरी आंदोलनामध्ये  सुरक्षा दलांचा कमीत कमा वापर व्हायला हवा. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे. मात्र सध्या अडचणीचा काळ आहे. शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करावे  ते समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताहेत."  
 यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्यानिमित्ताने राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ""शेतक-यांच्या दुर्दशेला काँग्रसच जबाबदार आहे. हा देश शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा आहे, याचा काँग्रेसला विसर पडलाय. त्यामुळेच आज शेतकरी दुरावस्थेत आहेत."" असा टोला त्यांनी लगावला. 
एनडीएची तीन वर्षांची वाटचाल यशस्वी ठरली आहे. देशी आणि आंतरराष्टीय संस्थाच्या सर्वेक्षणातूनही सरकार लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरल्याचे अहवाल आले आहेत.  सुशासनाला कटीबद्ध असे सरकार लोकांना हवे होते त्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.  
"देशातील आर्थिक सुधारणांना मोदी सरकारने गती दिली आहे. आजवर केवळ आर्थिक संकटातच आर्थिक सुधारणा केल्या गेल्या. मोदी सरकार मात्र आर्थिक स्थिती उत्तम असताना सुधारणा करणारे पहिले सरकार ठरले आहे. स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा म्हणजे जीएसटी असून, ही करप्रणाली भारतासाठी गेम चेंजर ठरेल," असे राजनाथ सिंह म्हणाले.  
सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला,  पूर्वोत्तर राज्यातील दहशतवादी घटना रोखण्यात  सरकारला मोठे यश मिळाले आहे.  स्वतंत्र भारतातील इतक्या परिणामकारकपणे पूर्वोत्तर राज्यातील दहशतवाद रोखणारे हे  पहिलचे सरकार आहे. तसेच नक्षलवादाविरोधात संबंधित राज्यांना केंद्र सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. सद्यस्थितील नक्षलवाद्यांच्या अटकेत 180 टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.