शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात सुरक्षा दलांचा व्हावा कमी वापर - राजनाथ सिंह

By admin | Updated: June 8, 2017 18:06 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुरक्षा दलांचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी...

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 8 - शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुरक्षा दलांचा वापर कमीत कमी केला गेला पाहिजे, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.  महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेला बळाचा वापर आणि मध्य प्रदेशात मंदासोर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी आज मुंबईत हे वक्तव्य केले . 
मध्य प्रदेशात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राजनाथ सिंह म्हणाले, "शेतकरी आंदोलनामध्ये  सुरक्षा दलांचा कमीत कमा वापर व्हायला हवा. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे. मात्र सध्या अडचणीचा काळ आहे. शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करावे  ते समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताहेत."  
 यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्यानिमित्ताने राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. ""शेतक-यांच्या दुर्दशेला काँग्रसच जबाबदार आहे. हा देश शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा आहे, याचा काँग्रेसला विसर पडलाय. त्यामुळेच आज शेतकरी दुरावस्थेत आहेत."" असा टोला त्यांनी लगावला. 
एनडीएची तीन वर्षांची वाटचाल यशस्वी ठरली आहे. देशी आणि आंतरराष्टीय संस्थाच्या सर्वेक्षणातूनही सरकार लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरल्याचे अहवाल आले आहेत.  सुशासनाला कटीबद्ध असे सरकार लोकांना हवे होते त्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.  
"देशातील आर्थिक सुधारणांना मोदी सरकारने गती दिली आहे. आजवर केवळ आर्थिक संकटातच आर्थिक सुधारणा केल्या गेल्या. मोदी सरकार मात्र आर्थिक स्थिती उत्तम असताना सुधारणा करणारे पहिले सरकार ठरले आहे. स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी आर्थिक सुधारणा म्हणजे जीएसटी असून, ही करप्रणाली भारतासाठी गेम चेंजर ठरेल," असे राजनाथ सिंह म्हणाले.  
सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला,  पूर्वोत्तर राज्यातील दहशतवादी घटना रोखण्यात  सरकारला मोठे यश मिळाले आहे.  स्वतंत्र भारतातील इतक्या परिणामकारकपणे पूर्वोत्तर राज्यातील दहशतवाद रोखणारे हे  पहिलचे सरकार आहे. तसेच नक्षलवादाविरोधात संबंधित राज्यांना केंद्र सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. सद्यस्थितील नक्षलवाद्यांच्या अटकेत 180 टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.