शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

सागरी लाटांशी १७ तास झुंज देत राजेशने गाठले बंदर

By admin | Updated: January 16, 2015 23:44 IST

एका खलाशाने काहीजणांनी धमकावल्याच्या भीतीने मुसाकाझी बंदरातील समुद्रात उडी टाकली

रत्नागिरी : मच्छिमारी नौकेवरून आलेल्या एका खलाशाने काहीजणांनी धमकावल्याच्या भीतीने मुसाकाझी बंदरातील समुद्रात उडी टाकली. त्यानंतर तब्बल १७ तास समुद्रातून पोहून येत आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता भगवती बंदर गाठले. अखेर स्थानिक बोटीवरील एका खलाशाने त्याला बोटीत घेतले व तटरक्षक दलाच्या स्वाधीन केले. राजेश उदेक करबट (३२, पालघर) असे त्याचे नाव असून, उपचारानंतर त्याला त्याच्या घरी पालघरला पाठविण्यात आले आहे. आज सायंकाळी भगवती बंदरातील समुद्रात कोणीतरी पोहत असल्याचे लक्षात आल्यावर संदेश करंजावकर (गावडेआंबेरे) याने त्याला आपल्या नौकेत घेतले. त्यानंतर राजेशची थरारक, भयावह कथा समोर आली. राजेशने दिलेल्या माहितीनुसार ज्या नौकेवरून तो मच्छिमारीसाठी आला होता, त्यातील काहींनी रात्री त्याला वेडा, पागल असल्याचे सांगत त्याच्याशी भांडण केले. त्याला पाण्यात ढकलून देण्याची धमकीही दिली. त्यामुळे घाबरून आपण रात्री १ वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. तेथून पोहत-पोहत कसेबसे भगवती बंदर गाठल्याचे त्याने सांगितले. तटरक्षक दलाच्या जवानांनी त्याला धीर देत नंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले व त्याला त्याच्या घरी पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)