शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ

By admin | Updated: January 3, 2015 00:47 IST

गोवारीकरांच्या नजरेतून कोल्हापूरचे --विसंवाद आजही कायम...द्रष्टेपण--‘राजाराम’मध्ये चार वर्षे

कोल्हापूर : बी.एस्सी. पदवी घेतली, त्या राजाराम महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव समारोप सोहळ्यात त्रिवेंद्रमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालकपदी असलेले डॉ. वसंतराव गोवारीकर हे प्रमुख पाहुणे होते. १३ मार्च १९८१ रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात गोवारीकर यांनी सुरेख इंग्रजीत राजाराम महाविद्यालय, विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे राजारामियन आणि दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचे कोल्हापूर याबाबत प्रकट चिंतन केले. जागतिक किर्तीचे अवकाश शास्त्रज्ज्ञ गोवारीकर या कार्यक्रमाला येणार असल्याने विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी गर्दी केली होती.कोल्हापूरच्या एकंदरीत सांस्कृतिक जीवनाचा अनमोल ठेवा असलेल्या राजाराम महाविद्यालयाचा परिसर यादिवशी आजी-माजी राजारामियन्स्नी फुलून गेला होता. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, जनरल एसपीपी थोरात, विद्यापीठाचे कुलगुरू रा. कृ. कणबरकर, महापालिका आयुक्त दिलीप करंदीकर, महापौर बाबूराव पारखे, ‘राजाराम’चे प्राचार्य रा. नि. ढमढेरे, आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी डॉ. गोवारीकर यांनी शास्त्रज्ञाला शोभेल असे सुरेख इंग्रजीत प्रकट चिंतन केले. गेल्या काही वर्षांत देशाच्या विविध क्षेत्रांत झालेल्या प्रगतीला जे कारणीभूत ठरले, त्यांच्या निष्ठांचे प्रतिनिधित्व राजाराम महाविद्यालय करते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. गत काही वर्षांत तंत्रज्ञानातील विकासाचे श्रेय त्यांनी ‘राजाराम’सारख्या संस्थांना दिले. अणुसंशोधन, अवकाश-तंत्रज्ञान, शेती या सर्व क्षेत्रांतील प्रगतीमध्येही दृष्ट्या राजारामियनांचा वाटा असल्याची ग्वाही दिली. पूर्वीच्या काही लोकांनी अशा संस्था स्थापन करण्यात दूरदृष्टी दाखविली, असे द्रष्टे कोल्हापूरमध्ये होते. तंत्रज्ञानात भारत पूर्वी मागासलेला होता, पण, म्हादबा मेस्त्री व पंडितराव कुलकर्णीसारखी माणसं कोल्हापूरकरांनी निर्माण केली. (राजाराम महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवातील स्मरणिकेतील प्रा. ब. शी. कुलकर्णी यांच्या लेखातून साभार)विसंवाद आजही कायम...‘राजाराम’मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी, नव्या भारताचे एक महाकाव्य निर्माण केल्याचे मत डॉ. गोवारीकर यांनी व्यक्त केले होते. देशातील सामाजिक परिस्थितीचा ऊहापोह करताना ते म्हणाले होते की, आज एकीकडे विज्ञानाची प्रगती होते आहे, तर दुसरीकडे अंधश्रद्धा, गरिबी आणि श्रीमंतीतील दरी वाढते आहे. एका दुभंगलेल्या जगात वावरतो आहोत, पण, अशा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्यांवर या दुभंगलेपणाचा परिणाम होत नाही. हा विसंवाद दूर करण्यासाठी आवश्यक दृष्टी इथे मिळालेली असते.‘राजाराम’मध्ये चार वर्षेगोवारीकर यांनी १९५८ मध्ये पी. डी. सायन्स्साठी राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी येथून बी.एस्सी. फिजिक्सची पदवीदेखील घेतली तेथून ते उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले.