शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज - उद्धव मनोमिलन होणार का? - बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी चर्चेला उधाण

By admin | Updated: November 17, 2014 16:17 IST

राज व उद्धव यांचं मनोमिलन होणार का याकडे पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ - बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी राज ठाकरे आले, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि राज व उद्धव यांचं मनोमिलन होणार का याकडे पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधीच मी एकत्र येण्याची तयारी दाखवली होती, परंतु उद्धव पुढे आला नाही असे राज यांनी जाहीर केले होते. कधी कुणी टाळीला हात पुढे केला तर दुस-याने टाळी दिली नाही असे अनेकवेळा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मात्र उद्धव व राज एकत्र येणार या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे खास सहकारी मानले जाणारे बाळा नांदगावकर यांनी तमाम मराठीजनांची इच्छा आहे की या दोघांचे मनोमिलन व्हावे. ते कधी होईल हे माहित नाही, परंतु ते व्हावा अशीच आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले.

तर छगन भुजबळांसारख्या राजकीय विरोधकांनी व पुर्वाश्रमीच्या शिवसैनिकांनीही राज व उद्धव यांनी एकत्र यावे असे मत वारंवार प्रकट केले आहे. आत्तापर्यंत केवळ कौटुंबिक संबंध जोपासायचे व राजकीय विरोधकाची भूमिका बजावायची असा पवित्रा शिवसेना व मनसे प्रमुखांनी घेतला होता. मात्र, लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये मनसेचे पानिपत झालं आणि राज्यात तर शिवसेनेला पुन्हा विरोधात बसायची वेळ आली. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही भावांनी एकत्र येणं ही राजकीय गरज आहे की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राज ठाकरे यांनी निवडणुकांदरम्यान एकत्र येण्याचा मानस व्यक्त केला होता, जो उद्धवनी झिडकारला. आताही उद्धव काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.