शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

राज ठाकरे यांचे ‘वरातीमागून घोडे’

By admin | Updated: December 10, 2015 13:13 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेली ‘स्मार्ट सिटी’ योजना फसवी असून, केवळ राजकीय फायद्यासाठी ही योजना आणण्यात आल्याची टीका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली

मुंबई/नाशिक : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेली ‘स्मार्ट सिटी’ योजना फसवी असून, केवळ राजकीय फायद्यासाठी ही योजना आणण्यात आल्याची टीका, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली असली, तरी मनसेच्या ताब्यात असलेल्या एकमेव नाशिक महापालिकेने मात्र, गेल्या आठवड्यात स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या विकासाला मंजुरी देत, तसा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे! मनसे प्रमुख राज यांनी मुंबई पत्रकारांशी बोलताना स्मार्ट सिटी योजनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘शहरांच्या विकासासाठी महापालिकेसारख्या स्वायत्त संस्था असताना, केंद्र सरकारने विनाकारण त्यात लुडबूड करू नये.या योजनेमध्ये केंद्राकडून दरवर्षी १०० कोटी याप्रमाणे पाच वर्षांत ५०० कोटी मिळणार आहेत, परंतु मुंबई, ठाणे, पुणे आदी महापालिकांचे अर्थसंकल्पच हजारो कोटींचे आहेत. त्यामुळे केंद्राचे १०० कोटी रुपयातून कोणतेही विकास प्रकल्प होऊ शकणार नाही. स्मार्ट सिटी ही राजकीय खेळी आहे. कामे महापालिकेने करायची आणि टीव्ही, वृत्तपत्रे व सोशल मीडियातील जाहिरातीतून केंद्र सरकारने त्याचे श्रेय लाटायचे, असा हा मामला असल्याची टीका राज यांनी केली. देशातील शहरांना मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. पालिकेने योजना पाठवाव्यात आणि केंद्राने निधी द्यावा, इतका सरळ हा व्यवहार आहे. पण यांचा हेतू स्वच्छ नाही. स्मार्ट सिटी, अमृत अशा एकामागून एक योजना लोकांच्या तोंडावर मारल्या जात आहेत. स्वत: मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेत. केंद्राकडून आम्हाला एक रुपया नको आणि आम्हीही केंद्राला एक रुपया देणार नाही. आम्ही आमच्या जीवावर गुजरात चालवू, असे ते म्हणत. मग हेच मोदी आता केवळ राजकीय फायद्यासाठी अशा योजना आणत आहेत. त्यामुळे मनसेचा स्मार्ट सिटी योजनेला विरोध असेल, असे राज यांनी यावेळी स्पष्ट केले. 

‘युपीए’ने गाजावाजा केला नाहीआधीच्या यूपीए सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेतूनही महापालिकांना निधी दिला होता. मात्र, त्या सरकारने इतका गाजावाजा केला नाही, असे राज यांनी सांगितले. ‘स्मार्ट सिटी’ योजनेतंर्गत राज्यातील ज्या १० शहरांची निवड झालेली आहे, त्यामध्ये नाशिक शहराचाही समावेश आहे. सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर नाशिक महापालिकेने आपले संपूर्ण लक्ष ‘स्मार्ट सिटी’ अभियानाकडे वळविले. पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी १० जुलै २०१५ रोजी केंद्राला गुणांक तक्ताही सादर केला. त्यानंतर दि. १७ जुलै रोजी महासभा होऊन ‘स्मार्ट सिटी’च्या सहभागाबाबतच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली. नवी मुंबई पाठोपाठ पुणे मनपाही बाहेर?गेल्या आठवड्यातराज्यात जिथून स्मार्ट सिटी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला त्या नवी मुंबई महापालिकेने ठराव करून या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आता पुणे महापालिकेतही स्मार्ट सिटी योजनेला सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. सभेच्या मान्यतेशिवाय सरकारला प्रस्ताव पाठविण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनविरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष निर्माण झाला आहे.

(लोकमत न्यूज नेटवर्क)