शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बदलत्या भूमिकांचा राज ठाकरेंना फटका!

By admin | Updated: February 1, 2017 02:21 IST

‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय’ असा आरोप करीत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज ‘विठ्ठल (शिवसेनाप्रमुख

- यदु जोशी,  मुंबई

‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय’ असा आरोप करीत राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज ‘विठ्ठल (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) हयात नाहीत. राज यांच्या भाषेतील बडव्यांच्या हातात शिवसेना असताना त्यांनी महापालिका निवडणुकीत युती करण्याची तयारी दाखविली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखलदेखील घेतली नाही. एकूणच गेल्या दोन दिवसांच्या संपूर्ण घटनाक्रमात मनसे आणि राज ठाकरे यांचे पूर्णत: हसे झाले. मनसेच्या निर्मितीनंतर राज यांची मोठी हवा तयार केली.‘कृष्णकुंज’ हा त्यांचा शिवाजी पार्कजवळील बंगला सत्तेचे नवे केंद्र म्हणून समोर आला. मात्र,राज यांनी त्याच बंगल्यात बसून जो भूमिकांचा ‘यूटर्नकुंज’केला त्यामुळे त्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले, असे त्यांचे जवळचे लोकही सांगतात. विधानसभा निवडणुकीत १३ आमदार २००९ मध्ये निवडून आणले. मुंबई, पुणे आणि नाशिक महापालिकेत चांगले यश मिळविले. नाशिकमध्ये तर सत्ता आणली. हा सगळा ‘राज करिष्मा’ होता. बाळासाहेबांसारखी वक्तृत्व शैली असलेल्या या युवा नेत्याने स्वत:विषयी प्रचंड अपेक्षा निर्माण केल्या. त्यांनी शिवसेना सोडली तरी भाषणाची खास शैली, एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असणे यामुळे ठाकरे ब्रँड त्यांच्याकडेही होताच. भूमिकांच्या यूटर्नबरोबरच पक्ष चालविण्यासाठीच्या मेहनतीची कमतरता हेही ऱ्हासाचे एक कारण ठरले. ‘पक्ष चालवायचा तर सकाळी सातला उठावे लागते’ असा टोमणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांचे नेतृत्व भरात असताना मारला होता. राज यांनी आपल्या भाषणांनी प्रभाव तर निर्माण केला पण तो कायम ठेवण्यासाठीची यंत्रणा/ कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात ते अपेशी ठरले. राजकीय भूमिका राज यांनीच बदलल्या असे नाही भाजपा, काँग्रेस अन् अगदी शिवसेनेनेदेखील त्या अनेकदा बदलल्या पण बदलेलेल्या भूमिकांवर लोकांचे समाधान करणारी यंत्रणा त्या पक्षांकडे होती.राज यांच्याकडे त्याचा अभाव आजही आहे. धरसोड भूमिकेमुळे नाशिकमध्ये केलेली चांगली कामे, मुंबई, पुण्यातील बऱ्याच मनसे नगरसेवकांची चांगली कामगिरी झाकोळली गेली. राज यांच्या नेतृत्वात राजकीय भवितव्य असुरक्षित वाटू लागल्याने अनेकांनी त्यांची साथ सोडली. मुंबईत शिवसेनेविरुद्ध अनेक विषय उचलण्यासारखे असतानाही त्यांच्यापुढे मैत्रीचा हात करून मनसेने धक्का दिला. दोन्ही भावांनी एकत्र यावे अशी प्रामाणिक इच्छा बाळगून अनेकदा त्यासाठी प्रयत्न करणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची हतबलता ही मनसेैनिकांची प्रातिनिधीक हतबलता आहे. राज यांनी उद्धव ठाकरे यांना युतीसाठी फोन केले. एवढेच नव्हे तर, ‘अरे! मनसेचे अस्त्वित्व अजूनही आहे का’, अशी कुत्सित विचारणारा चॅनेलवरील मुलाखतीत करणारे खा.संजय राऊत यांनाही राज यांनी फोन केले. तरीही शिवसेनेकडून कोणीही मनसेला भीक घातली नाही. पक्षाची दयनीयता या निमित्ताने समोर आली असून वारंवारच्या ‘यूटर्नकुंज’ऐवजी ‘चिंतनकुंज’ तत्काळ होणे आवश्यक असल्याची मनसेतील नेत्यांची भावना आहे. - ‘मला काही सांगायचय’ असे आवाहन करीत राज्यभरातील मनसैनिकांना गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत बोलावले. लोक मोठ्या संख्येने आलेदेखील.- राज यांनी स्वत: निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आणि आठ दिवसांतच यू टर्न घेत लढण्याचा निर्धार गुंडाळला.- लोकसभा निवडणुकीत पुणे आणि नाशिक सोडून भाजपाच्या विरोधात उमेदवारच दिले नाहीत. या अनाकलनीय भूमिकेने राज यांच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले.- छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला राज यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांना मानणाऱ्या मतदारांमध्ये नाराजी पसरली, असे राजकीय जाणकारांना वाटते.