शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे नकलाकार : नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला : देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: February 18, 2017 19:51 IST

राज ठाकरे दावा करतात की नाशिकचे ‘नवनिर्माण’ आम्ही केले; पण ते हे विसरतात की त्यांची महापालिका सक्षम नाही

नाशिक : राज ठाकरे दावा करतात की नाशिकचे ‘नवनिर्माण’ आम्ही केले; पण ते हे विसरतात की त्यांची महापालिका सक्षम नाही त्यामुळे महापालिकेचा खर्चाची रक्कमही राज्य-केंद्र सरकारने द्यावी, कुंभमेळा यशस्वी करायचा आहे, असे त्यांनीच मला सांगितले होते. सरकारने २२००कोटी रुपयांचा कुंभमेळा विकास निधी दिला आणि कुंभमेळा आदर्शपध्दतीने पार पडला. नाशिकचा चेहरा भाजपाने बदलला आणि मी वचन देतो नाशिकला मी दत्तक घेतो आणि नाशिकला गतवैभव पाप्त करुन दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना देत ठाकरे बंधूंवर हल्ला चढविला.महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी सभेला गर्दीच नसल्याने शहरात पावणेपाच वाजेपासून दाखल झालेले फडणवीस यांना तब्बल तासभर प्रतिक्षा करावी लागली. पावणेसात वाजता फडणवीस यांनी माईक हातात घेतला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज ठाकरे हे नकलाकार आहे, त्यांच्याकडे यापुढे नकलाच करण्याचे काम राहणार आहे. त्यांच्याक डे कल्पकबुध्दी आहे, हे चांगले आहे; मात्र दुर्देवाने ते त्या बुध्दीचा चांगला वापर करत नाही, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला. राज ठाकरे म्हणतात ‘बॉटनिकल गार्डन’ आम्ही केले; मात्र ते हे विसरतात की वनविभागाने तेथे खुप आगोदरपासून वनसंपदा जपून ठेवली होती तेथे ‘दिवाबत्ती’ रस्त्यांची सोय केली म्हणून ते गार्डन तुमचे झाले असे मुळीच नाही. नाशिकचे तात्यासाहेब ज्यांचा संपुर्ण महाराष्ट्राला हेवा वाटतो त्यांच्या नावाने असलेल्या कुसुमाग्रज उद्यानाच्या विकासासाठी सत्तेत नसताना ‘मनसे’ रस्त्यावर उतरली, चांगले केले मात्र सत्तेत आल्यानंतर कुसुमाग्रज उद्यानाचा त्यांना विसर पडला हे दुर्देवच आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने आंदोलने करुन प्रसिध्दी मिळविली आणि भोळ्याभाबड्या नाशिककरांना थापा देऊन सत्ता मिळविली; मात्र आता सुज्ञ नाशिककर मनसेला नाशिकबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी व्यासपिठावर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे आदि उपस्थित होते.--फडणवीस यांच्या भाषणातील मुददे :* शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नाही तर क र्जमुक्त करणे हा भाजपाचा उद्देश आहे.* शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि ती आम्ही देणार.* नाशिकला फूड पार्क साकारून फळोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आधार’ देऊ.* शिवसेना-मनसेने खालच्या पातळीवर जाऊन ‘डीसी’ची यादी तयार करुन व्हायरल केली.* भाजपा राज्य व केंद्रात विकासाच्या नावावर सत्तेत आली आहे.* लबाडांच्या भुलथापांना बळी पडू नका.* लवकर महिंद्र कंपनी नाशकात १५०० कोटींची गुंतवणूक करुन नव्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार आहे.* विकासाकरिता नाशिक भाजपाला हवे आहे.* नाशिकमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यास नाशिकचे गतवैभव पुन्हा प्राप्त करु न दिल्याशिवाय राहणार नाही.* नाशिकला कोणी वाली नाही, असे म्हणणारे खुप आहे, पण मी नाशिकला आज दत्तक घेतले असून यापुढे नाशिक माझे आहे.*भाजपाची सत्ता आल्यास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील सर्व झोपडपट्टयांमधील गरीबांच्या घरांचा प्रस्ताव तयार करुन द्या, जेवढ्या घरांचा प्रस्ताव येईल, तेवढे घरे दिल्याशिवाय राहणार नाही. कारण ही ‘इंदिरा आवास योजना नाही’.*नाशिकच्या विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयासोबत माझा संवाद सुरू आहे.