शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

राज-राणे हातमिळवणी?

By admin | Updated: July 31, 2014 04:35 IST

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत असल्याचे चित्र आहे

मुंबई : उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे सध्या राजकीयदृष्ट्या अडचणीत असल्याचे चित्र आहे. शिवसेना सोडल्याने स्वतंत्र राजकारण करणाऱ्या या दोन्ही नेत्यांचा उद्धव विरोध मात्र अद्याप कायम आहे. त्यामुळे आगामी काळात राज-राणे हातमिळवणी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शिवसेना सोडल्यानंतर आक्रमकपणे मराठीचा मुद्दा मांडणाऱ्या राज ठाकरेंची सुरुवात धडाकेबाज झाली. मुंबई महापालिका, विधानसभेत मनसेने घवघवीत यश मिळविले. तर काँग्रेसवासी झालेल्या नारायण राणे यांनी शिवसेनेची कोंडी करण्यात यश मिळविल्याने राज्यात आपला दबदबा निर्माण केला. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांची राजकीय गणिते बिघडली आहेत. मराठीच्या मुद्द्यावर ठोस भूमिका आणि विकासाचे राजकारणात अपयशी ठरल्याने मतदारांनी मनसेला साफ नाकारले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदावर दावेदारी सांगणाऱ्या राणेंच्या मुलाला त्यांच्याच जिल्ह्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर बंडाचा पवित्रा घेणारे राणे काँग्रेसमध्येच एकाकी पडल्याचे चित्र आहे. गेली नऊ वर्षे स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करणाऱ्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी सलोख्याचे संबंध ठेवले. सध्या मात्र एकाचवेळी दोघांची पुरती कोंडी झाली आहे. नाराज राणेंना सामावून घ्यायला कोणताच पक्ष तयार नाही, तर मनसेला महायुतीची दारे बंद आहेत. अशावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे एकमेकांशी हातमिळविणी करण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत. सहकार्याचे राजकारण करीत मुंबई आणि कोकणात यश मिळविण्यावर भर देण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)