शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तूरडाळीवरील निर्यातबंदी उठवा; राज्याचे केंद्राला साकडे

By admin | Updated: April 28, 2017 03:11 IST

तूरडाळीच्या निर्यातीवर असलेली बंदी केंद्र सरकारने तातडीने उठवावी, असे साकडे राज्य सरकार केंद्राला घालणार आहे. मुख्यमंत्री

मुंबई : तूरडाळीच्या निर्यातीवर असलेली बंदी केंद्र सरकारने तातडीने उठवावी, असे साकडे राज्य सरकार केंद्राला घालणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे पत्र केंद्राला पाठविण्याचे आदेश दिले आहेत. निर्यातबंदी उठली तर तूरकोंडी मोठ्या प्रमाणात सुटू शकेल, असा राज्य शासनाचा कयास आहे. तुरीचे उत्पादन घटून तूरडाळीचे भाव गगनाला भिडू लागल्यामुळे २००७ मध्ये डाळीच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय तत्कालीन यूपीए सरकारने घेतला होता. तेव्हापासून ही बंदी उठलेली नाही. ती उठवावी तसेच तूरडाळीवरील आयात शुल्कात वाढ करावी, अशी विनंतीही राज्याकडून केंद्राला केली जाणार आहे. सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. निर्यातीवरील बंदी उठली तर राज्यातील डाळीची विदेशात विक्री करता येईल. भारतीय डाळींना जगात नेहमीच मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच मोठ्या प्रमाणात नाफेडला तूरविक्री केल्याच्या गंभीर आरोप झाल्याने आता उर्वरित खरेदी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने आज एक आदेश जारी केला. त्यानुसार, शेतकऱ्यांचा सातबारा उतारा, शेतकऱ्यांनी नेमकी किती क्षेत्रावर तूर पेरलेली होती, हेक्टरी उत्पादन किती याची खातरजमा करूनच तूर खरेदी केली जाणार आहे. तूरखरेदीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ; मुंबई विदर्भ सहकारी पणन महासंघ; नागपूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते एफएक्यू दर्जाची तूर प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये या दराने खरेदी करतील. शेतकऱ्यांनी यंदाच पण या आधी शासनाला कुठे कुठे आणि किती तुरीची विक्री केली आहे या बाबत त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र (सेल्फ डिक्लरेशन) घेण्यात येणार आहे. शेतकऱ्याने आणलेली तूर ही त्याच्या शेतातीलच असल्याची खात्री पडल्यानंतर त्याच्याकडून तूरखरेदी केली जाईल. (विशेष प्रतिनिधी)

ज्याच्या नावे सातबाराचा उतारा आहे त्याचे आधारकार्ड संलग्न बँक खात्यात तुरीची रक्कम जमा केली जाईल.खरेदी केंद्रांवर शिल्लक असलेल्या तुरीचा पंचनामा करण्यास समिती असेल. शिल्लक तुरीबाबतच्या या समितीच्या माहितीला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देताच तूरखरेदी सुरू करण्यात येईल.

सर्वाधिक तूर विकलेल्यांची चौकशी-नाफेड, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवर आणि आता पणन महासंघांच्या केंद्रांवर सर्वाधिक तुरीची विक्री केलेल्या शेतकऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच तूरविक्री करून मलिदा लाटला अशा तक्रारी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अन्य राज्यांमध्ये तूर विक्रीचा पर्याय-सूत्रांनी सांगितले की, राज्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेल्या डाळीची देशातील अन्य राज्यांमध्ये विक्री करण्याच्या पर्यायावरही राज्य शासन विचार करीत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही प्रमुख तूरडाळ उत्पादक राज्ये आहेत. संबंधित खरेदी केंद्राशी संलग्न असलेल्या गावांव्यतिरिक्त इतर गावांतील, परराज्यातील तूर त्या केंद्रावर खरेदी केली जाणार नाही.