शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू

By admin | Updated: January 6, 2015 02:13 IST

शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणामुळे मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून आरक्षण देणे गरजेचे आहे,

पुणे : शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणामुळे मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून आरक्षण देणे गरजेचे आहे, हे सरकार उच्च न्यायालयास पटवून देईल, त्यासाठी उत्तमोत्तम वकिलांची फौज उभी करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात संमत केल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेतेर्फे शिंदेशाही पगडी, तलवार आणि शिवप्रतिमा देऊन फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे होते. मागील सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत खोटारडेपणा केला. मात्र १९ फेब्रुवारीला, शिवजयंतीच्या दिवशी जगातील या भव्य स्मारकाचे भूमीपूजन केले जाणार असून, या स्मारकाचे काम कमीत कमी वेळेत व्हावे यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. मराठा समाजाची स्थिती अतिशय दयनीय असून फक्त शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची आमची मागणी आहे. राजकीय आरक्षण आम्हाला कधीच नको, असे मेटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ब्राह्मणांना रक्षण हवे काम करणे हीच आमची जात आहे. सर्वांना आरक्षण देता येणार नाही. मात्र एखाद्या समाजातील तळाच्या माणसाला ते दिले जावे, असा विचार झाला पाहिजे. ब्राह्मणांना रक्षण द्यावे, आरक्षण नको. ब्राह्मणांनी नोकऱ्या न करता उद्योगधंदा करावा, असे माझे आवाहन आहे, असे गिरीश बापट म्हणाले.शिवस्मारक समिती अध्यक्षपदी मेटेराष्ट्रवादीतील सन्मान सोडून केवळ मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी मेटे भाजपाच्या साथीला आले, असे सांगून फडणवीस यांनी मेटे यांची शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली.