शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडसाठी देणार दीडपट निधी

By admin | Updated: January 22, 2016 03:32 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी तसेच या गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्विकासासाठी तसेच या गडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित रायगड महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘जागतिक नकाशावर रायगड झळकावा हा या महोत्सवामागचा उद्देश आहे. महोत्सवातून पर्यटनाला चालना मिळेल,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘छत्रपतींचा इतिहास केवळ त्यांच्या शौर्यापुरताच मर्यादित नव्हता. रयतेचा पालक कसा असू शकतो हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले होते. राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही, महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आराखडा तयार केला आहे. त्यात रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी १२ कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र रायगड किल्ल्याच्या पुनर्बांधणी व पुनर्विकासासाठी अर्थमंत्री घोषित करतील त्याच्या दीडपट निधी मंजूर केला जाईल,’ अशी घोषणाही फडणवीस यांनी या वेळी केली. ‘राज्यासह केंद्रातही आम्ही सत्तेवर आहोत त्यामुळे पुरातत्त्व विभागाला राज्य शासनाकडून दिलेला रायगड विकासाबाबतचा प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर होईल,’ असेही फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवसृष्टी साकारणाऱ्या कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे त्यांनी याप्रसंगी कौतुक केले. (विशेष प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ‘या महोत्सवामुळे रायगडचा इतिहास जिवंत होऊन त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल,’ असा विश्वास व्यक्त केला. ‘गडावर पूर्वी शिवरायांना दिली जाणारी शासकीय मानवंदना काही वर्षांपासून खंडित झाली आहे. ती मानवंदना पुन्हा सुरू करावी,’ अशी मागणीही गीते यांनी या वेळी केली.कार्यक्रमाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, माजी मंत्री आमदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयंत पाटील, आमदार विनायक मेटे, पोलीस उपमहासंचालक प्रकाश बोरुडे, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, सांस्कृतिक संचालक अजय आंबेकर उपस्थित होते. अलिबाग : राणीवसा, पालखी दरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वराचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, राजसदरेवरील मेघडंबरी या स्थळांना भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवकालीन इतिहासाचा अनुभव घेतला. त्यांनी समाधी व राजसदर येथील सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला आदरांजली वाहिली. राजसदर येथे मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य व अत्यंत देखणे नाट्य सादर करण्यात आले. जवळपास दीड तास मुख्यमंत्र्यांनी शिवकालीन इतिहास अनुभवला. छत्रपतींच्या काळातील पारंपरिक टाळनृत्य, दांडपट्टा, कसरतीचे मर्दानी खेळ, ढोल-ताशे यांनी उपस्थितांना शिवकाळाची झलक दाखविली. शिवरायांच्या काळात रायगड कसा होता याचे साक्षात रूप साकारण्यात आले आहे. याचा आनंद व समाधान वाटत असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ‘महाराजांचे नियोजन, दूरदृष्टी, स्थापत्यशास्त्र तसेच गतकालीन संस्कृती आदी बाबींची जाणीव व माहिती नव्या पिढीला या महोत्सवामुळे होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.