शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

पावसाळी कामांना सुरुवातच नाही

By admin | Updated: May 19, 2016 01:41 IST

अनेक ठिकाणचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडर काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

पुणे : मे महिना संपण्यास दहा ते बारा दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप शहरातील अनेक ठिकाणचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडर काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे यंदा बहुतांश ठिकाणच्या सफाईची कामे कागदावरच राहण्याची भीती आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामे योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक बनले आहे. अन्यथा हे नाले, गटारे तुबूंन शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. १२ दिवसांत कामे कशी पूर्ण करणार ?दर वर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातात. आता मे महिना संपण्यास केवळ १२ दिवस उरले आहेत. मात्र, यंदा अनेक क्षेत्रीय कार्यालयांचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडरच अद्याप काढण्यात आले नाही. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन वर्कआॅर्डर कधी काढली जाणार आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाल्यांची परिस्थिती खूपच वाईटशहरामध्ये वारजे, शिवाजीनगर, प्रभात रोड, औंध, बावधन, कोथरूड, पाषाण, बाणेर, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी, हडपसर, कोंढवा, कोरेगाव पार्क, कॅम्प, मार्केटयार्ड, नवी पेठ, अलका चौक, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, धायरी या परिसरातून प्रमुख २७ नाले वाहतात. वर्षभर या नाल्यांमध्ये प्लॅस्टिक, राडारोडा व इतर विविध प्रकारचा कचरा अडकून पडलेला आहे. या नाल्यांची सफाई न झाल्यास पावसाळयामध्ये पाण्याचा मोठा प्रवाह नाल्यातून वाहू लागल्यानंतर पुरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाल्याच्या परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)>पालिका आयुक्तांकडूनच दुर्लक्षमहापालिकेच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून पावसाळी पूर्व कामांकडे पाहिले जाते. एप्रिल महिन्यात आयुक्तांकडून सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते. त्यानंतर कामे वेळेत व्हावीत, याकरिता आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, झोनचे उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी सातत्याने या कामांवर लक्ष ठेवून असतात. मात्र, यंदा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून पावसाळी कामांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे.