शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

धरणक्षेत्राकडे पावसाची पाठ

By admin | Updated: September 19, 2015 03:34 IST

विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील

मुंबई : विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील पाण्याची पातळी अद्यापही वाढत नसल्याने भविष्यात मुंबईतील २० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे चित्र आहे.पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करायचा असेल तर १ आॅक्टोबर रोजी सातही तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर्स पाणी असणे आवश्यक आहे. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी तलावातील पाण्याने १० लाख दशलक्ष लीटर्सचीही पातळी गाठलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सातही तलावांत एकूण ९ लाख ९४ हजार १५२ दशलक्ष लीटर्स पाण्याच्या पातळीची नोंद झाली आहे. हा जलसाठा १२ लाख दशलक्ष लीटर्स झाला तरी मुंबईकरांना भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.परंतु राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना मागील २४ तासांत या तलाव क्षेत्रांत मात्र पावसाची नाममात्र नोंद झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोडक सागर, तानसा, विहार, अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा क्षेत्रात पावसाची नोंदच झालेली नाही; तर तुलसी तलाव क्षेत्रात २ मिलिमीटर आणि भातसा तलाव क्षेत्रात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरातही केवळ ढग दाटून येत असून, पावसाने उघडीपच घेतली आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरीही पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या वारंवार सरी कोसळतील; तर काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (प्रतिनिधी)