शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

धरणक्षेत्राकडे पावसाची पाठ

By admin | Updated: September 19, 2015 03:34 IST

विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील

मुंबई : विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील पाण्याची पातळी अद्यापही वाढत नसल्याने भविष्यात मुंबईतील २० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे चित्र आहे.पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करायचा असेल तर १ आॅक्टोबर रोजी सातही तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर्स पाणी असणे आवश्यक आहे. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी तलावातील पाण्याने १० लाख दशलक्ष लीटर्सचीही पातळी गाठलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सातही तलावांत एकूण ९ लाख ९४ हजार १५२ दशलक्ष लीटर्स पाण्याच्या पातळीची नोंद झाली आहे. हा जलसाठा १२ लाख दशलक्ष लीटर्स झाला तरी मुंबईकरांना भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.परंतु राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना मागील २४ तासांत या तलाव क्षेत्रांत मात्र पावसाची नाममात्र नोंद झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोडक सागर, तानसा, विहार, अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा क्षेत्रात पावसाची नोंदच झालेली नाही; तर तुलसी तलाव क्षेत्रात २ मिलिमीटर आणि भातसा तलाव क्षेत्रात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरातही केवळ ढग दाटून येत असून, पावसाने उघडीपच घेतली आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरीही पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या वारंवार सरी कोसळतील; तर काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (प्रतिनिधी)