शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

थंडीनंतर पावसाची चिन्हे!

By admin | Updated: December 31, 2014 01:03 IST

गत तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेल्या नागपूरकरांना पुढच्या काळात पावसापासून बचाव करावा लागणार आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे

नागपूर तापमान: ७.१ अंश. से.नागपूर : गत तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे गारठलेल्या नागपूरकरांना पुढच्या काळात पावसापासून बचाव करावा लागणार आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात अंशत: वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे.गत काही दिवसांपासून तापमानात कमालीची घट झाल्याने नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात थंडीची लाट आल्याने नागरिक यामुळे गारठून गेले आहेत. मंगळवारी त्यांना थंडीपासून थोडी उसंत मिळाली. सोमवारच्या तुलनेत किमान तापमानात २.१ अंशाने वाढ होऊन ते ७.१ अंश. से. वर स्थिरावले. पुढच्या २४ तासात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगाल खाडीच्या दक्षिण-पश्चिम भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतातील हवामानात बदल अपेक्षित आहे. त्यानुसार पुढच्या ४८ तासात पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)विमानसेवेलाही फटकाधुक्यामुळे विमान वाहतुकीला फटका बसू लागला आहे.मंगळवारी नागपूरहून दिल्ली व मुंबईकडे जाणाऱ्या विमानांसह नागपूर ते शारजहाला जाणाऱ्या विमानालाही गडद धुक्याचा फटका बसला. नागपूरहून शारजहाकडे जाणारे (फ्लाईट क्रमांक जी ९-४१६) विमान निर्धारित वेळेच्या एक तास उशिरा रवाना झाले. देशांतर्गत विमान वाहतुकींपैकी नागपूर-रायपूर, नागपूर -दिल्ली, नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई विमानांना एक तास उशीर झाला.