शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

सहा एकर जमिनीवर पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे होणार संकलन!

By admin | Updated: January 1, 2017 01:27 IST

श्री अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थानचा उपक्रम; पाण्याचे शुद्धीकरण करून केल्या जाईल उपयोग

अरविंद गाभणे मालेगाव (जि. वाशिम), दि. ३१- जैन समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र शिरपूर जैन येथील अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थानच्यावतीने सहा एकर जागेमध्ये परसबाग उभारण्यात येत आहे. या परसबागेत पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे संकलन केल्या जाणार आहे. तसेच संकलित करण्यात आलेल्या पाण्याच्या उपयोगाचेही नियोजन करण्यात आले आहे. श्‍वेतांबर जैन मुनीश्री पन्न्यासप्रवर विमलहंस विजयजी महाराज व पन्न्यासप्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्या मार्गदर्शनात श्री. अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थानमध्ये बर्‍याच दिवसांपासून या परसबागेचे कार्य जोमाने चालू आहे. हजारो कामगारांच्या हस्ते परसबाग साकारल्या जात आहे. परसबागेमध्ये भक्तनिवास संकुल, प्रसादालयासह विविध बांधकाम सुरू आहेत. या परिसरात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, याकरिता व्यवस्था केली आहे. जमिनीवर फरशी, टाइल्स बसविल्या असून, त्याचा उतार काढण्यात आला आहे. उताराच्या बाजूला नाल्या करण्यात आल्यात यामुळे पावसाचे पाणी परसबागेतील रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाणार आहे. हे पाणी या नालीच्या लगत असलेल्या झाडांना ड्रिपरच्या पाइपने सोडलेले आहे. झाडाला जर पाणी जास्त होत असेल, तर त्या पाइपांना बूच लावून बंद केल्यानंतर नालीतून जल संकलनासाठी तयार करण्यात आलेल्या ठिकाणी जाईल. जल संकलनासाठी दोन फूट रुंद व तीन फूट खोल व पाच हजार फूट लांब पक्की नाली बांधण्यात आली आहे. नालीच्या तळाला बेड टाकण्यात आले नाही. नालीत दगड टाकून ती भरण्यात आली आहे. यामुळे या नालीत पडणारे पाणी जमिनीत झिरपेल. तरीही पाण्याचे प्रमाण जास्त झाले, तर ते संकलित करण्यासाठी ४0 फूट आकाराचा व १५ फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये दगड व गिट्टी टाकण्यात येत आहे. यात साठलेले पाणी येथे बांधण्यात येत असलेल्या जलमंदिरात घेण्यात येणार आहे. तसेच भक्तिनिवासात असलेल्या स्नानगृहातही हे पाणी शुद्ध करून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.     पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब वाहून न जाता तो भूगर्भात गेला पाहिजे, याकरिता हा वर्षाजल संकलनाचा उपक्रम राबविला आहे. विदर्भातील हा एकमव उपक्रम असावा, असे वाटते.- दिनेश मुथा,व्यवस्थापक, श्री. अंतरिक्ष श्‍वेतांबर जैन संस्थान, शिरपूर.  या वर्षाजल संकलनामुळे परसबागेजवळील विहिरी व कुपनलिका यांच्या भूजल पातळीत वाढ होणार आहे. जैन संस्थानने केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. - विनायकराव देशमुख,कार्याध्यक्ष, अखिल भारतीय नेहरू ब्रिगेड, वाशिम.