शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
2
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
3
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
4
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
5
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
6
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
7
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
8
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
9
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
10
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
11
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
12
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
13
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
14
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
15
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
16
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
17
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
18
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
19
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
20
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले

गावागावांत होणार पावसाची नोंद

By admin | Updated: April 16, 2016 02:30 IST

देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने

- राजानंद मोरे, पुणे

देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने देशाला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना पावसाची स्थिती तसेच कृषीविषयक सल्ला देण्याचे नियोजन आहे.सध्या देशात शहर, तालुक्याची ठिकाणे, धरण पाणलोट क्षेत्र किंवा काही महत्त्वाच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याआधारे संपूर्ण शहर, तालुक्याची पावसाची सरासरी काढली जाते. आता ‘एक गाव एक पर्जन्यमापक यंत्र’ हे सूत्र निश्चित करण्यात आले असून देशातील तब्बल सहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेविषयी कृषी मौसम विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन. चटोपाध्याय म्हणाले की, देशाच्या भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास पावसाच्या प्रमाणात खूप वैविध्य आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या परिसरात पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण सांगणे तसे शक्य होत नाही. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविल्यास कमी अंतरावरील पावसाचे अचूक प्रमाण समजण्यास मदत होणार आहे. त्यानुसार तेथील पावसाच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध मार्गदर्शन करणे शक्य होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गाव किंवा परिसरात एखादी योजना राबविण्याबाबतही मदत होईल. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमापक बसविण्याचा मान यामुळे भारताला मिळणार आहे.कर्नाटकमधून लवकरच या योजनेची सुरुवात होईल. येत्या पावसाळ्यात तेथील किमान शंभर गावांत यंत्रे बसविली जातील. तसेच सहा महिन्यांत किमान दोन राज्यांमध्ये ही यंत्रे बसविली जातील. गावा-गावांमधून पावसाची माहिती एसएमएसद्वारे एनआयसीकडे संकलित केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांना प्रशिक्षणही दिले जाईल. - डॉ. एन. चटोपाध्याय, उपमहासंचालक, कृषी मौसम विज्ञान विभाग