शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

राज्यात पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: August 17, 2015 00:48 IST

कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ

पुणे : कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ वगळता विदर्भ व मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणीच पाऊस पडला.मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे विदर्भात पाऊस पुन्हा सक्रीय झाला होता. अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस झाला. पण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा नाहिसा झाला आहे. तसेच आग्नेय उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहार व ईशान्य मध्य प्रदेशाच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्रही विरून गेले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागातून पाऊस गायब झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यात गोंदियात सर्वाधिक १७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल महाबळेश्वरमध्ये ७ मिमी पाऊस पडला. यवतमाळमध्ये ०.४, नाशिक येथे १, सातारा येथे ०.३, मुंबईत ३ तर रत्नागिरी येथे १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणात जव्हार, कणकवली, कुडाळ, चिपळूण, देवगड, गुहागर, सावंतवाडी, संगमेश्वर, पोलादपूर, देवरूख, मंडणगड येथे पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर, एरंडोल, गगनबावडा, ओझरखेडा, पारोळा, पेठ, शाहूवाडी येथे पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात तुरळक ठिकाणे वगळता पाऊस पडला नाही. पुढील आठवडाभर राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)