शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

राज्यात पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: August 17, 2015 00:48 IST

कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ

पुणे : कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ वगळता विदर्भ व मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणीच पाऊस पडला.मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे विदर्भात पाऊस पुन्हा सक्रीय झाला होता. अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस झाला. पण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा नाहिसा झाला आहे. तसेच आग्नेय उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहार व ईशान्य मध्य प्रदेशाच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्रही विरून गेले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागातून पाऊस गायब झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यात गोंदियात सर्वाधिक १७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल महाबळेश्वरमध्ये ७ मिमी पाऊस पडला. यवतमाळमध्ये ०.४, नाशिक येथे १, सातारा येथे ०.३, मुंबईत ३ तर रत्नागिरी येथे १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणात जव्हार, कणकवली, कुडाळ, चिपळूण, देवगड, गुहागर, सावंतवाडी, संगमेश्वर, पोलादपूर, देवरूख, मंडणगड येथे पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर, एरंडोल, गगनबावडा, ओझरखेडा, पारोळा, पेठ, शाहूवाडी येथे पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात तुरळक ठिकाणे वगळता पाऊस पडला नाही. पुढील आठवडाभर राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)