शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यात पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: August 18, 2015 02:19 IST

मॉन्सूनला बरसण्यासाठी अनुकूल स्थिती नसल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यात कोठेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसल्याची माहिती

पुणे : मॉन्सूनला बरसण्यासाठी अनुकूल स्थिती नसल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यात कोठेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नसल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. सोमवारी देखील जोरदार पावसाची नोंद झाली नाही.राज्यात मॉन्सून सक्रिय असण्यासाठी अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होणे गरजेचे असते. गेल्या आठवड्यात असे पट्टे तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, आता हे पट्टे विरल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.गेल्या २४ तासांत कोकण, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा कोरडाच होता. विदर्भातील मोहाडीफाटा येथे सर्वाधिक ७० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ भामरागड येथे ६०, दर्यापूरमध्ये ३०, भिरा, मालवण, मुरूड, पनवेल, रोहा, विक्रमगड, इगतपुरी, महाबळेश्वर, ओझरखेडा, सुरगाणा, एटापल्ली, गोंदिया येथे २०, अंबरनाथ, चिपळूण, हर्णे, जव्हार, कर्जत, खालापूर, माथेरान, मुंबई, पोलादपूर, शहापूर, पाली, ठाणे, उल्हासनगर, वेंगुर्ला, पेठ, चिखलदरा, हिंगणघाट, साकोली, लाखनी येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.घाटमाथ्यांवरही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत अंबोणे, शिरगाव, डुंगरवाडी, दावडी, ताम्हिणी घाटात ३०, भिरा, लोणावळा घाटात २०, कोयना, खंद, शिरोटा, वळवण, खोपोली, कोयना, धारावी घाटात १० मिमी पावसाची नोंद झाली.पुढील २४ तासांत कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.