शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

एसटीकडे प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: December 23, 2016 05:15 IST

बस स्थानकांवरील सोयी, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, अयोग्य तिकीट इत्यादी तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून एसटी

मुंबई : बस स्थानकांवरील सोयी, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, अयोग्य तिकीट इत्यादी तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी सर्वाधिक येत असल्याचे समोर आले. गेल्या दोन वर्षांत दोन हजारपेक्षा जास्त तक्रारी या गैरवर्तनाच्या आहेत. त्यामुळे चांगली वर्तवणूक ठेवून प्रवासी वाढवा अशा सूचना वारंवार करूनही त्याकडे कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्षच होत आहे. एकंदरीतच प्रवाशांच्या तक्रारी पाहता त्या त्वरित सोडवता याव्यात यासाठी ‘२४ तास कॉल सेंटर’ उभारण्याची तयारी एसटी महामंडळाने केली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत विविध कारणांनी मोठी घट झाली. पाच वर्षांत १५ कोटी प्रवासी कमी झाले असून हा सर्वात जास्त फटका आहे. त्यामुळे महामंडळाने नवीन वर्षातील जानेवारी महिन्यापासून तीन महिन्यांसाठी प्रवासी वाढवा विशेष अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणारे आगार, चालक, वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. प्रवासी कमी होण्याची विविध कारणे असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत असून यामध्ये प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारी हेदेखील प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्याच्या २0१४-१५ मध्ये १ हजार २७ तक्रारी प्राप्त झाल्या. तर २0१५-१६ मध्ये हाच आकडा १ हजार १२ एवढा आहे. त्यानंतर सर्वाधिक तक्रारी बसमध्ये जागा न मिळण्याबाबतच्या आहेत. गेल्या वर्षी ३९९ तर या वर्षी ३८६ तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. तसेच एसटी बसचा नसलेला वक्तशीरपणा, अयोग्य तिकीट, प्रवास भाडे याबाबतच्याही तक्रारी एसटीकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत.