शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुंबईत पाऊसच जोरदार, महानगरपालिका काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:42 IST

मुंबईत जास्तीचा पाऊस पडतो, त्याला पालिका कशी जबाबदार, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांवरील खड्डे, तुंबणारी मुंबई आणि वाहतूक

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत जास्तीचा पाऊस पडतो, त्याला पालिका कशी जबाबदार, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांवरील खड्डे, तुंबणारी मुंबई आणि वाहतूककोंडीच्या मुद्द्यांवरून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. मुलुंड येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कालिदास नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या ‘सोनूऽ साँग’च्या माध्यमातून आरजे मलिष्काने पालिका कारभाराची खिल्ली उडवली होती. या व्हिडीओत खड्ड्यांपासून वाहतूककोंडीपर्यंत पालिकेला जबाबदार धरण्यात आल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जरा काही झाले की महापालिकेवर खापर फोडले जाते. मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार? गदारोळ आणि आरोप करणे सोपे असते. मुंबईत सध्या बराच पाऊस पडतोय. पण कुठेही तुंबातुंबी झाली नाही. संपूर्ण पावसाळा कुठेही पाणी न तुंबता जाईल. पण इतर शहरे आणि नद्या तुंबताहेत, असे सांगून मुंबईच्या प्रत्येक कामात घोटाळा शोधणारे ‘घोटाळेबाज’ आता कुठे आहेत, असा सवालही ठाकरे यांनी केला. रस्ते, पाणी, शाळा, रुग्णालयांप्रमाणे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची नाट्यगृहे असायला हवीत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाकवी कालीदास नाट्यमंदिरामुळे मुंबईच्या वैभवात आणखी भर पडली आहे. या वास्तूमुळे घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले आहे, असे ठाकरे म्हणाले.