शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मुंबईत पाऊसच जोरदार, महानगरपालिका काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:42 IST

मुंबईत जास्तीचा पाऊस पडतो, त्याला पालिका कशी जबाबदार, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांवरील खड्डे, तुंबणारी मुंबई आणि वाहतूक

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत जास्तीचा पाऊस पडतो, त्याला पालिका कशी जबाबदार, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांवरील खड्डे, तुंबणारी मुंबई आणि वाहतूककोंडीच्या मुद्द्यांवरून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. मुलुंड येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कालिदास नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या ‘सोनूऽ साँग’च्या माध्यमातून आरजे मलिष्काने पालिका कारभाराची खिल्ली उडवली होती. या व्हिडीओत खड्ड्यांपासून वाहतूककोंडीपर्यंत पालिकेला जबाबदार धरण्यात आल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जरा काही झाले की महापालिकेवर खापर फोडले जाते. मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार? गदारोळ आणि आरोप करणे सोपे असते. मुंबईत सध्या बराच पाऊस पडतोय. पण कुठेही तुंबातुंबी झाली नाही. संपूर्ण पावसाळा कुठेही पाणी न तुंबता जाईल. पण इतर शहरे आणि नद्या तुंबताहेत, असे सांगून मुंबईच्या प्रत्येक कामात घोटाळा शोधणारे ‘घोटाळेबाज’ आता कुठे आहेत, असा सवालही ठाकरे यांनी केला. रस्ते, पाणी, शाळा, रुग्णालयांप्रमाणे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची नाट्यगृहे असायला हवीत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाकवी कालीदास नाट्यमंदिरामुळे मुंबईच्या वैभवात आणखी भर पडली आहे. या वास्तूमुळे घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले आहे, असे ठाकरे म्हणाले.