शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

कोकणात परतणार पाऊस

By admin | Updated: July 7, 2015 01:56 IST

अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल.

पुणे : अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल. पण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात मात्र १२ जुलैपर्यंत पाऊस पडणार नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोकणवगळता राज्यात पाऊस परण्याची चिन्हे नसल्याने दुबार पेरणीचे संकट आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.सध्या राज्यात कोठेही मॉन्सून सक्रिय नाही. त्यामुळे गेल्या २४ तासांत राज्यात कोठेही पाऊस झालेला नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो. पण सध्या अशी कोणतीही स्थिती नाही. त्यामुळे पूर्ण राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पण अरबी समुद्रात केरळपासून गुजरातपर्यंत किनारपट्टीच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा हळूहळू सक्रिय होत आहे. त्यामुळे बुधवारपासून कोकणात पुन्हा पावसास सुरूवात होईल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल, असे डॉ. खोले म्हणाल्या....तर, दुबार पेरणीची शक्यता !च्राज्यात ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून ८ दिवस पावसाने ओढ दिल्याने पेरण्या थांबल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची शक्यता आहे, अशी माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.च्पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागात खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. सरासरीपेक्षा कमी, ८८ टक्के पाऊस होईल असा नवा अंंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला होता. शेतकऱ्यांनी जमीनीत पुरेशा ओलाव्याची खात्री करुनच पेरण्या कराव्यात, त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट के ले होते.च्राज्यात खरिपाचे ऊस वगळता १ कोटी ३० लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास कोणती पीके घ्यायला लागतील त्याचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय कृषी संचालकांना दिल्या असल्याचे देशमुख म्हणाले.महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी साधारणत: १५ जुलैनंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस पडेल.- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालिका, भारतीय हवामानशास्त्र विभाग