शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

कोकणात परतणार पाऊस

By admin | Updated: July 7, 2015 01:56 IST

अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल.

पुणे : अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल. पण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात मात्र १२ जुलैपर्यंत पाऊस पडणार नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोकणवगळता राज्यात पाऊस परण्याची चिन्हे नसल्याने दुबार पेरणीचे संकट आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.सध्या राज्यात कोठेही मॉन्सून सक्रिय नाही. त्यामुळे गेल्या २४ तासांत राज्यात कोठेही पाऊस झालेला नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो. पण सध्या अशी कोणतीही स्थिती नाही. त्यामुळे पूर्ण राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पण अरबी समुद्रात केरळपासून गुजरातपर्यंत किनारपट्टीच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा हळूहळू सक्रिय होत आहे. त्यामुळे बुधवारपासून कोकणात पुन्हा पावसास सुरूवात होईल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल, असे डॉ. खोले म्हणाल्या....तर, दुबार पेरणीची शक्यता !च्राज्यात ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून ८ दिवस पावसाने ओढ दिल्याने पेरण्या थांबल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची शक्यता आहे, अशी माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.च्पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागात खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. सरासरीपेक्षा कमी, ८८ टक्के पाऊस होईल असा नवा अंंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला होता. शेतकऱ्यांनी जमीनीत पुरेशा ओलाव्याची खात्री करुनच पेरण्या कराव्यात, त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट के ले होते.च्राज्यात खरिपाचे ऊस वगळता १ कोटी ३० लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास कोणती पीके घ्यायला लागतील त्याचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय कृषी संचालकांना दिल्या असल्याचे देशमुख म्हणाले.महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी साधारणत: १५ जुलैनंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस पडेल.- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालिका, भारतीय हवामानशास्त्र विभाग