शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाऊस अजून ढगातच!

By admin | Updated: June 20, 2017 01:27 IST

हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आजवरची आकडेवारी पाहिली तर काही ठिकाणी पाऊस तत्वत:च हजेरी लावून गेल्याचे दिसून येते. राज्यात काही ठिकाणी बरसलेल्या पावसाने सरासरी ओलांडली असल्याचे चित्र कागदावर दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता इतरत्र पावसाने पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. आत्तापर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाडा वगळता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी दिसून येत आहे. काही ठिकाणी सात दिवसांची देखील ओढ दिसून येत आहे. पारंपरिक दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. पुणे वेधशाळेचे अधिकारी अरविंद श्रीवास्तव म्हणाले, मान्सूनच्या वाटचालीत कधीही सलगता नसते. कधी अनुकूल आणि प्रलिकूल परिस्थिती उद्भवते. त्यावरच त्याची वाटचाल अवलंबून असते. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. येत्या दोन दिवसांत या स्थितीत बदल होऊन मान्सून पुन्हा सक्रीय होईल. येत्या दोन ते ३ दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल. तर, २५ ते २७ जून दरम्यान संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होईल, असे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले. राज्यातील अनेक भागांत पावसाने आठवड्यापेक्षा जास्त ओढ दिली आहे. तेथील पिकांवर काहीसा परिणाम होऊ शकतो, असेही साबळे यांनी स्पष्ट केले.