शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

पाऊस अजून ढगातच!

By admin | Updated: June 20, 2017 01:27 IST

हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आजवरची आकडेवारी पाहिली तर काही ठिकाणी पाऊस तत्वत:च हजेरी लावून गेल्याचे दिसून येते. राज्यात काही ठिकाणी बरसलेल्या पावसाने सरासरी ओलांडली असल्याचे चित्र कागदावर दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता इतरत्र पावसाने पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. आत्तापर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाडा वगळता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी दिसून येत आहे. काही ठिकाणी सात दिवसांची देखील ओढ दिसून येत आहे. पारंपरिक दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. पुणे वेधशाळेचे अधिकारी अरविंद श्रीवास्तव म्हणाले, मान्सूनच्या वाटचालीत कधीही सलगता नसते. कधी अनुकूल आणि प्रलिकूल परिस्थिती उद्भवते. त्यावरच त्याची वाटचाल अवलंबून असते. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. येत्या दोन दिवसांत या स्थितीत बदल होऊन मान्सून पुन्हा सक्रीय होईल. येत्या दोन ते ३ दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल. तर, २५ ते २७ जून दरम्यान संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होईल, असे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले. राज्यातील अनेक भागांत पावसाने आठवड्यापेक्षा जास्त ओढ दिली आहे. तेथील पिकांवर काहीसा परिणाम होऊ शकतो, असेही साबळे यांनी स्पष्ट केले.