शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

पावसाचा मच्छिमारांना फटका

By admin | Updated: March 1, 2015 23:14 IST

नौका बंदरात उभ्या : बाजारपेठेत मच्छिची आवक घटली

मालवण : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा, काजू बागायतदारांबरोबरच मत्स्य व्यवसायावरही झाला असून अवकाळी पाऊस आणि त्यातच सोसाट्याचा वारा यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे बाजारपेठेत माशांची आवक घटली असून माशांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. समुद्रात ताशी ५० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून रविवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारठा होता. ही परिस्थिती आणखी आठवडाभर राहणार असल्याची शक्यता जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.किनारपट्टीवर शनिवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. अचानक बदललेल्या वातावरणामुळे पहाटे १.३० वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. यानंतर पहाटे ४ वाजेपर्यंत किनारपट्टी भागात संततधार सुरू होती. रविवारी दुपारपासूनही पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व हवेत गारठा असल्यामुळे त्याचा परिणाम आंबा बागायती तसेच मासेमारी व्यवसायावरही दिसून येणार आहे.समुद्रात ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. समुद्रातील अचानक बदललेल्या हवामानामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. यामुळे मच्छिमारी व्यवसाय थंडावला आहे. यामुळे बाजारात माशांची आवक घटली असून माशांचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी ३०० ते ३५० रूपये किलो दराने विकली जाणारी सुरमई आज ५०० रूपये किलो दराने विकली जात होती. बांगुरडी १०० रूपये वाटा तर धोडये ५० रूपये वाटा अशा चढ्या दराने बाजारात मासे विकले जात होते. मासे महाग झाल्यामुळे मत्स्य खवय्यांनी चिकन-मटणवर जोर दिल्याचे दिसून आले. बाजारात भाज्यांचेही भाव दिवसभरात वाढलेले होते.किनारपट्टीवर ढगाळ वातावरण अधूनमधून पाऊस व जोरदार वारा असाच आठवडाभर सुरू राहणार असल्याचा अंदाज स्थानिक जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केला आहे. मासेमारीबरोबरच या बदललेल्या वातावरणाचा फटका आंबा बागायतीला बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहोरांवर बुरशीचा प्रादूर्भाव वाढणार आहे. तसेच तुडतुडा व किडरोगाच्या वाढीस ढगाळ वातावरण पोषक असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या मुंबई मार्केट हजार ते दीड हजार रूपये डझन दराने आंबा विकला जात आहे. कोकणात अवकाळी पडलेल्या पावसामुळे तयार झालेल्या आंबा फळांवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. गेल्यावर्षी फळमाशीच्या कारणावरून पाश्चिमात्य देशांनी आंबा नाकारल्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडला होता. यावर्षी अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांवर पुन्हा आपत्ती आली आहे.कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी करून शासनाला तसा अहवाल पाठविण्याची मागणी आंबा बागायतदारांकडून सुरू झालीआहे. (प्रतिनिधी)मालवणात चिखलाचे साम्राज्य शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मालवण शहरात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शहरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसामुळे या ठिकाणी चिखल पसरला आहे. याचा फटका वाहनचालक व पादचाऱ्यांना बसत आहे. पावसामुळे शहरात व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसभरात बीएसएनएलची सेवा मात्र सुरळीत सुरू होती.