शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

पावसाचा मच्छिमारांना फटका

By admin | Updated: March 1, 2015 23:14 IST

नौका बंदरात उभ्या : बाजारपेठेत मच्छिची आवक घटली

मालवण : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा, काजू बागायतदारांबरोबरच मत्स्य व्यवसायावरही झाला असून अवकाळी पाऊस आणि त्यातच सोसाट्याचा वारा यामुळे मच्छिमारांनी आपल्या नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या. त्यामुळे बाजारपेठेत माशांची आवक घटली असून माशांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. समुद्रात ताशी ५० किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून रविवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारठा होता. ही परिस्थिती आणखी आठवडाभर राहणार असल्याची शक्यता जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.किनारपट्टीवर शनिवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला होता. अचानक बदललेल्या वातावरणामुळे पहाटे १.३० वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. यानंतर पहाटे ४ वाजेपर्यंत किनारपट्टी भागात संततधार सुरू होती. रविवारी दुपारपासूनही पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व हवेत गारठा असल्यामुळे त्याचा परिणाम आंबा बागायती तसेच मासेमारी व्यवसायावरही दिसून येणार आहे.समुद्रात ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. समुद्रातील अचानक बदललेल्या हवामानामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. यामुळे मच्छिमारी व्यवसाय थंडावला आहे. यामुळे बाजारात माशांची आवक घटली असून माशांचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी ३०० ते ३५० रूपये किलो दराने विकली जाणारी सुरमई आज ५०० रूपये किलो दराने विकली जात होती. बांगुरडी १०० रूपये वाटा तर धोडये ५० रूपये वाटा अशा चढ्या दराने बाजारात मासे विकले जात होते. मासे महाग झाल्यामुळे मत्स्य खवय्यांनी चिकन-मटणवर जोर दिल्याचे दिसून आले. बाजारात भाज्यांचेही भाव दिवसभरात वाढलेले होते.किनारपट्टीवर ढगाळ वातावरण अधूनमधून पाऊस व जोरदार वारा असाच आठवडाभर सुरू राहणार असल्याचा अंदाज स्थानिक जाणकार मच्छिमारांनी व्यक्त केला आहे. मासेमारीबरोबरच या बदललेल्या वातावरणाचा फटका आंबा बागायतीला बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहोरांवर बुरशीचा प्रादूर्भाव वाढणार आहे. तसेच तुडतुडा व किडरोगाच्या वाढीस ढगाळ वातावरण पोषक असल्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या मुंबई मार्केट हजार ते दीड हजार रूपये डझन दराने आंबा विकला जात आहे. कोकणात अवकाळी पडलेल्या पावसामुळे तयार झालेल्या आंबा फळांवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. गेल्यावर्षी फळमाशीच्या कारणावरून पाश्चिमात्य देशांनी आंबा नाकारल्यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडला होता. यावर्षी अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांवर पुन्हा आपत्ती आली आहे.कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा बागायतदारांच्या नुकसानीची पाहणी करून शासनाला तसा अहवाल पाठविण्याची मागणी आंबा बागायतदारांकडून सुरू झालीआहे. (प्रतिनिधी)मालवणात चिखलाचे साम्राज्य शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मालवण शहरात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शहरात भुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसामुळे या ठिकाणी चिखल पसरला आहे. याचा फटका वाहनचालक व पादचाऱ्यांना बसत आहे. पावसामुळे शहरात व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसभरात बीएसएनएलची सेवा मात्र सुरळीत सुरू होती.