शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

खड्ड्यांच्या मुद्द्यावर तक्रारींचा ‘पाऊस’

By admin | Updated: September 21, 2016 02:12 IST

पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांचा विषय स्थायी समिती सभेत गाजला.

पिंपरी : पावसाळ्यात रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांचा विषय स्थायी समिती सभेत गाजला. ‘पहिल्या पावसात पडलेले खड्डे बुजविल्यानंतर दुसऱ्या पावसात त्याच ठिकाणी खड्डे पडतातच कसे?’ असा सवाल सदस्यांनी व्यक्त केला. ‘रस्त्यांच्या कामांची तपासणी करण्याची गरज आहे’, अशी मागणीही सदस्यांनी केली. याबाबत कडक धोरण राबवावे, अशी अपेक्षाही व्यक्त झाली.पहिल्याच पावसात पडलेल्या खड्ड्यांविषयी सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ज्या रस्त्यावरील खड्डे बुजविले, तिथेचे खड्डे पडले आहेत, अशा तक्रारी सदस्यांनी आजच्या सभेत केल्या. ‘रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी एसजीएस संस्था असतानाही खड्डे पडतात कसे, याबाबत प्रश्नही उपस्थित करण्यात आला. नारायण बहिरवाडे म्हणाले, ‘‘प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम केल्यानंतर त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. एवढा मोठा पाऊस पडलेला नसतानाही खड्डे पडतातच कसे? एखादा रस्ता तयार केल्यानंतर तीन वर्षे त्या रस्त्याचे काम करण्याची गरज भासू नये. ठेकेदारांकडून वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता तपासणी गरजेचे आहे. तशा अधिकाऱ्यांना सूचना देण्याची गरज आहे.’’ धनंजय आल्हाट म्हणाले, ‘‘जोरदार पाऊस नसतानाही रस्त्यावर खड्डे कसे काय पडले? निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यानेच बुजविलेल्या जागेवर खड्डे पडले आहेत.’’ त्यानंतर अध्यक्ष डब्बू आसवानी यांनी पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, अशा सूचना केल्या. (प्रतिनिधी)