शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

पावसाचे पुन्हा धुमशान!, मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा : प. महाराष्ट्रातही मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 07:12 IST

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय, या भीतीने मुंबईकरांना धडकीच भरली.

मुंबई : मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा धुवाधार पाऊस बरसला. पावसाचे रौद्ररूप पाहून २९ आॅगस्टसारखी स्थिती पुन्हा निर्माण होते की काय, या भीतीने मुंबईकरांना धडकीच भरली. लांब पल्ल्याच्या रेल्वेसह विमानसेवाही विस्कळीत झाली होती. कोकणातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या ७२ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी सकाळीच ढग दाटून आले. भर दुपारी सर्वत्र काळोख पसरला. अरबी समुद्राहून वाहणारे वारे आणखी वेगाने वाहू लागले. पश्चिम उपनगरासह पूर्व उपनगरातून शहरात दाखल होणाºया पावसाने सर्वप्रथम बोरीवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, साकीनाका, पवई, मुलुंड, भांडुप, घाटकोपरसह वांद्रे-कुर्ला परिसराला झोडपून काढले. दुपारी सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. काही लोकल रद्द झाल्या.रत्नागिरीत हर्णे येथे ३२ तासांत ५२९ मिमी पाऊस झाला. आंजर्ले (ता. दापोली) येथे तीन बोटी बुडाल्या असून त्यावरील खलाशांना वाचवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. माणगाव खोºयातील आंबेरी येथील पुलावर पुराचे पाणी असल्याने २७ गावांचा संपर्क तुटला. मालवण तालुक्यातील मसुरे, बागायत, कावा या गावांतही पूरस्थिती आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे रायगडमध्ये सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्यांची पातळी वाढली आहे.>मराठवाड्यात बरसणारयेत्या २४ तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मुंबईत मुसळधार पाऊस पडेल.>विमानसेवेवर परिणाम : विमाने उतवण्यासाठी अडचणी येत असल्याने चार विमाने वळवण्यात आली होती. तर काही विमाने अर्धा ते एक तास उशिराने उड्डाण घेत होती. मुंबईकडे येणारी विमाने अहमदाबाद, जयपूर, दिल्ली, चेन्नईकडे वळवण्यात आली आहेत. संध्याकाळी स्पाइस जेटचे वाराणसी-मुंबई विमान लँड होताना धावपट्टीवरून सरकले आणि त्याचे चाक चिखलात जाऊन रुतले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नव्हते. प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.>ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊसठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सत्रांतील विद्यार्थ्यांचे सायंकाळी घरी परततानाहाल झाले. रेल्वे भरून येत असल्याने ठाणे स्थानकात गर्दी झाली होती.पालघरमध्ये १ ठारपालघर जिल्ह्यातील टेम्भी गावात चक्रीवादळात सापडून किनाºयावर नांगरलेल्या ७ बोटी चिरल्या. बोटीचा भाग अंगावर पडल्याने संदीप तांडेल (५०) यांचा मृत्यू झाला.>पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधारपश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने उपनद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.