शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस

By admin | Updated: May 12, 2017 20:40 IST

वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाण्यासह नवी मुंबईतील देखील बहुतांश परिसरांत पावसाच्या हजेरीमुळे काहीवेळ आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. 
 
मुंबईतील पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, मुलुंडसह भांडुप येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येथे पावसाने विजांच्या कडकडासह हजेरी लावली. अंधेरी, वडाळा, दादर आणि अ‍ॅन्टॉप हिल येथेही पावसाच्या आगमनाने वातावरण थोडे सुखावले. घाटकोपर परिसरात तब्बल पंधरा मिनिटे झालेल्या पावसावेळी तांत्रिक खोळंब्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ रखडली होती. 
 
थोड्याच वेळात ती पूर्ववतही झाली. घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप येथे पडलेल्या हलक्या पावसांच्या सरींमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहितीही स्थानिकांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळीच मुंबईवर आभाळ दाटून आले होते. गडद दाटून आलेल्या ढगांनंतर सुरु झालेल्या वीजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरात लावलेल्या पावसाच्या हजेरीमुळे यंदा पाऊस लवकर येणार का? असा कयासही मुंबईकर लावत होते. तथापि, या अवकाळी पडलेल्या तुरळक पावसामुळे पुढचे काही दिवस उकाड्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
 
लोणावळा परिसरात पावसाची हजेरी
लोणावळा परिसरात आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सायंकाळ पासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होऊन गार हवा सुटली होती. तसेच आकाशात ढगांचा गडगडाट व विजेचा लखलखाट सुरु झाला होता. मागील काही दिवसांपासून लोणावळा परिरात गरमी वाढली होती. दुपारच्या सत्रात 36 ते 39 दरम्यान तापमान जाऊ लागल्याने नागरिक हैराण झाले होते. आज दिवसभर प्रचंड गरमी वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. यातच सायंकाळच्या वेळेत मावळात दाखल झालेला पाऊस लोणावळ्यात कधी येणार अशी चर्चा रंगली असताना रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावत नागरिकांना सुखद दिलासा दिला. लहान मुलांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे वाटसरुची मात्र तारांबळ उडाली, जागा मिळेल त्या ठिकाणी आडोसा पाहून दुचाकी चालक व वाटसरु उभे होते. पावसाला सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल झाल्याने नागरिकांना काही काळ अंधारात रहावे लागले.