शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस

By admin | Updated: May 12, 2017 20:40 IST

वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाण्यासह नवी मुंबईतील देखील बहुतांश परिसरांत पावसाच्या हजेरीमुळे काहीवेळ आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. 
 
मुंबईतील पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, मुलुंडसह भांडुप येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येथे पावसाने विजांच्या कडकडासह हजेरी लावली. अंधेरी, वडाळा, दादर आणि अ‍ॅन्टॉप हिल येथेही पावसाच्या आगमनाने वातावरण थोडे सुखावले. घाटकोपर परिसरात तब्बल पंधरा मिनिटे झालेल्या पावसावेळी तांत्रिक खोळंब्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ रखडली होती. 
 
थोड्याच वेळात ती पूर्ववतही झाली. घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप येथे पडलेल्या हलक्या पावसांच्या सरींमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहितीही स्थानिकांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळीच मुंबईवर आभाळ दाटून आले होते. गडद दाटून आलेल्या ढगांनंतर सुरु झालेल्या वीजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरात लावलेल्या पावसाच्या हजेरीमुळे यंदा पाऊस लवकर येणार का? असा कयासही मुंबईकर लावत होते. तथापि, या अवकाळी पडलेल्या तुरळक पावसामुळे पुढचे काही दिवस उकाड्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
 
लोणावळा परिसरात पावसाची हजेरी
लोणावळा परिसरात आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सायंकाळ पासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होऊन गार हवा सुटली होती. तसेच आकाशात ढगांचा गडगडाट व विजेचा लखलखाट सुरु झाला होता. मागील काही दिवसांपासून लोणावळा परिरात गरमी वाढली होती. दुपारच्या सत्रात 36 ते 39 दरम्यान तापमान जाऊ लागल्याने नागरिक हैराण झाले होते. आज दिवसभर प्रचंड गरमी वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. यातच सायंकाळच्या वेळेत मावळात दाखल झालेला पाऊस लोणावळ्यात कधी येणार अशी चर्चा रंगली असताना रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावत नागरिकांना सुखद दिलासा दिला. लहान मुलांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे वाटसरुची मात्र तारांबळ उडाली, जागा मिळेल त्या ठिकाणी आडोसा पाहून दुचाकी चालक व वाटसरु उभे होते. पावसाला सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल झाल्याने नागरिकांना काही काळ अंधारात रहावे लागले.