शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस

By admin | Updated: May 12, 2017 20:40 IST

वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  वाढत्या उन्हाच्या काहिलीसह घाम फोडणा-या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईत शुक्रवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाण्यासह नवी मुंबईतील देखील बहुतांश परिसरांत पावसाच्या हजेरीमुळे काहीवेळ आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. 
 
मुंबईतील पूर्व उपनगरात कुर्ला, घाटकोपर, मुलुंडसह भांडुप येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येथे पावसाने विजांच्या कडकडासह हजेरी लावली. अंधेरी, वडाळा, दादर आणि अ‍ॅन्टॉप हिल येथेही पावसाच्या आगमनाने वातावरण थोडे सुखावले. घाटकोपर परिसरात तब्बल पंधरा मिनिटे झालेल्या पावसावेळी तांत्रिक खोळंब्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक काहीकाळ रखडली होती. 
 
थोड्याच वेळात ती पूर्ववतही झाली. घाटकोपर, मुलुंड आणि भांडुप येथे पडलेल्या हलक्या पावसांच्या सरींमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहितीही स्थानिकांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळीच मुंबईवर आभाळ दाटून आले होते. गडद दाटून आलेल्या ढगांनंतर सुरु झालेल्या वीजांच्या कडकडाटासह मुंबईसह उपनगरात लावलेल्या पावसाच्या हजेरीमुळे यंदा पाऊस लवकर येणार का? असा कयासही मुंबईकर लावत होते. तथापि, या अवकाळी पडलेल्या तुरळक पावसामुळे पुढचे काही दिवस उकाड्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
 
लोणावळा परिसरात पावसाची हजेरी
लोणावळा परिसरात आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सायंकाळ पासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होऊन गार हवा सुटली होती. तसेच आकाशात ढगांचा गडगडाट व विजेचा लखलखाट सुरु झाला होता. मागील काही दिवसांपासून लोणावळा परिरात गरमी वाढली होती. दुपारच्या सत्रात 36 ते 39 दरम्यान तापमान जाऊ लागल्याने नागरिक हैराण झाले होते. आज दिवसभर प्रचंड गरमी वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. यातच सायंकाळच्या वेळेत मावळात दाखल झालेला पाऊस लोणावळ्यात कधी येणार अशी चर्चा रंगली असताना रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावत नागरिकांना सुखद दिलासा दिला. लहान मुलांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे वाटसरुची मात्र तारांबळ उडाली, जागा मिळेल त्या ठिकाणी आडोसा पाहून दुचाकी चालक व वाटसरु उभे होते. पावसाला सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागात बत्ती गुल झाल्याने नागरिकांना काही काळ अंधारात रहावे लागले.