शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

पाऊस २५ टक्के, पेरण्या १५ टक्के

By admin | Updated: July 8, 2014 01:13 IST

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत.

अमरावती विभाग : सर्वाधिक पेरण्या यवतमाळात, दुबार पेरणीचे संकट यवतमाळ : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले. एक महिना उलटूनही पावसाचा पत्ता नाही. एरवी या महिनाभरात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पेक्षा अधिक पाऊस नोंदविला जातो. परंतु यावर्षी अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्यात केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता जुलै महिनाही कोरडाच जातो की काय अशी हूरहूर शेतकऱ्यांसह पाणीटंचाई सामना करणाऱ्या नागरिकांना लागली आहे. विभागात ३२ लाख ८४ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ १५ टक्के अर्थात पाच लाख सात हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ४२ टक्के पेरण्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. स्प्रिंकलर व ड्रीपची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्याने त्या उलटण्याची चिन्हे आहेत. पांढरकवडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. मात्र पावसाने दडी मारली. जमिनीतील ओल आणखी जास्तीत जास्त आठवडाभर टिकू शकणार आहे. त्यानंतर मात्र पिकांचे काहीच खरे नाही. आठवडाभरात पाऊस न आल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची चिन्हे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)