शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

पाऊस २५ टक्के, पेरण्या १५ टक्के

By admin | Updated: July 8, 2014 01:13 IST

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत.

अमरावती विभाग : सर्वाधिक पेरण्या यवतमाळात, दुबार पेरणीचे संकट यवतमाळ : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १५ टक्के पेरण्या होऊ शकल्या आहेत. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले. एक महिना उलटूनही पावसाचा पत्ता नाही. एरवी या महिनाभरात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पेक्षा अधिक पाऊस नोंदविला जातो. परंतु यावर्षी अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्यात केवळ २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता जुलै महिनाही कोरडाच जातो की काय अशी हूरहूर शेतकऱ्यांसह पाणीटंचाई सामना करणाऱ्या नागरिकांना लागली आहे. विभागात ३२ लाख ८४ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ १५ टक्के अर्थात पाच लाख सात हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ४२ टक्के पेरण्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. स्प्रिंकलर व ड्रीपची सोय नसलेल्या शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्याने त्या उलटण्याची चिन्हे आहेत. पांढरकवडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. मात्र पावसाने दडी मारली. जमिनीतील ओल आणखी जास्तीत जास्त आठवडाभर टिकू शकणार आहे. त्यानंतर मात्र पिकांचे काहीच खरे नाही. आठवडाभरात पाऊस न आल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची चिन्हे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)