शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

रेल्वे मार्गाचे काम एप्रिलपासून

By admin | Updated: January 21, 2016 03:57 IST

जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जयगड ते डिंगणी मार्गासाठी जमीन भूसंपादनाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार असून एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची ७० वी बैठक मंत्रालयात झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील बंदरांचा विकासासाठी शासन आग्रही आहे. कोकण रेल्वे कार्पोरेशन, जयगड बंदर आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत जयगड ते डिंगणी हा ३५ कि.मी.चा नवीन रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येत आहे. ७७५ कोटींच्या या प्रकल्पाच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कोकण रेल्वे कार्पोरेशनने पूर्ण केले आहे.या बैठकीत व्यापक ‘बंदर विकास धोरण-२०१५’ च्या सद्य:स्थितीवर त्याचबरोबर रेवस-आवरे, विजयदुर्ग व रेडी या बंदर विकास प्रकल्पांना मुदतवाढ देण्याबाबत चर्चा झाली. तसेच ‘महाराष्ट्र जलक्रीडा प्रकल्प धोरण-२०१५’ तयार करण्यात आले असून त्यास बोर्डाची मान्यता देण्यात आली. तर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे सॅटेलाईट पोर्टच्या निर्मितीकरिता जेएनपीटी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यातील सामंजस्य करारास मंजुरी देणे, दिघी-रोहा रेल्वे जोडणी प्रकल्पात बोर्डाने घ्यावयाचे समभाग, पनवेल खाडीमध्ये मौजे उलवा येथे शिपयार्ड प्रकल्प निर्माण करणे, वांद्रे-वरळी सागरी सेतुनजीक माहीम खाडीमधील बोर्डाच्या मालकीच्या जेट्टीवरुन तरंगते हॉटेल प्रकल्प चालविणे, ठाणे खाडी किनारी वाशी पुलाजवळ मौजे तुर्भे येथे बहुउद्देशीय जेट्टी निर्माण करणे, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे बोर्डाच्या स्वमालकीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे, रेवस येथे अंतर्गत जल वाहतूक प्रकल्पांतर्गत रो-रो जेट्टी तसेच सुविधा विकसित करणे आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.