शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

रेल्वेला द्यावी लागणार नुकसानभरपाई!

By admin | Updated: February 6, 2016 03:36 IST

लांबच्या पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये लुटमार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ऐन वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस नसणे

दीप्ती देशमुख,  मुंबईलांबच्या पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये लुटमार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ऐन वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस नसणे ही तर नित्याची बाब झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. एका महिलेचे दागिने चोरीला गेल्याबद्दल आणि तिला मानसिक त्रास सहन करावा लागल्याबद्दल दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंचाने पश्चिम रेल्वेला ६४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. गुजरातमध्ये वलसाड येथे राहणाऱ्या ऐकल शाह व त्यांचा चार वर्षीय मुलगा राज शहा २०१४ मध्ये वापी पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत असताना दोन गुंडांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे दागिने, पर्स, मोबाईल इत्यादींची चोरी केली.धावत्या ट्रेनमधून उडी मारुन हे दोन्ही चोर फरार झाले. त्यांच्यापाठोपाठ ऐकल यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र प्लॅटफॉर्मवर एकही पोलीस नव्हता. अंधेरी स्टेशनला ट्रेन थांबल्यानंतर बाजूच्या डब्ब्यातील प्रवाशांनी ऐकल यांना मदत केली. प्रवशांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणाऱ्या रेल्वेला ऐकल यांनी ग्राहक मंचात खेचले. आरक्षित डब्ब्यात कोणीही चढू नये, याची खबरदारी घेण्याचे काम टीसीचे असतानाही त्या दिवशी संबंधित डब्यात टीसी नव्हता. त्याशिवाय प्लॅटफॉर्मवर एकही पोलीस नव्हता. रेल्वेने कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई, चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत आणि या प्रसंगामुळे मुलाच्या मनावर परिणाम झाला म्हणून त्याला डॉक्टरांकडून उपाय करण्यासाठी आलेला खर्च इत्यादी मिळून पश्चिम रेल्वेने १७ लाख ९० हजार ३७३ रुपये द्यावेत, असेही ऐकल यांनी याचिकेत नमूद केले आहे.मात्र पश्चिम रेल्वेने ऐकल यांची मागणी साफ फेटाळली. ‘रेल्वे लवादाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. ग्राहक मंचाच्या अखत्यारित ही केस येत नाही. तसेच ऐकल यांचे सामान बुक केलेले नव्हते. बुकिंग केलेले सामान चोरीला किंवा गहाळ झाल्यास रेल्वे त्याची जबाबदारी घेते. त्यामुळे ऐकल यांना त्यांचे दागिने, पर्स आणि मोबाईल चोरीगेल्याबद्दल नुकसान भरपाई दिली जाऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद रेल्वेच्या वकिलांनी ग्राहक मंचाकडे केला. मात्र ग्राहक मंचाने त्यांचा युक्तिवाद फेटाळत रेल्वेने कर्तव्यात कसूर केल्याचे म्हटले.