शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

रेल्वेला द्यावी लागणार नुकसानभरपाई!

By admin | Updated: February 6, 2016 03:36 IST

लांबच्या पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये लुटमार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ऐन वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस नसणे

दीप्ती देशमुख,  मुंबईलांबच्या पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये लुटमार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ऐन वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस नसणे ही तर नित्याची बाब झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाचा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. एका महिलेचे दागिने चोरीला गेल्याबद्दल आणि तिला मानसिक त्रास सहन करावा लागल्याबद्दल दक्षिण मुंबई ग्राहक तक्रार निवारण मंचाने पश्चिम रेल्वेला ६४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. गुजरातमध्ये वलसाड येथे राहणाऱ्या ऐकल शाह व त्यांचा चार वर्षीय मुलगा राज शहा २०१४ मध्ये वापी पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत असताना दोन गुंडांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांचे दागिने, पर्स, मोबाईल इत्यादींची चोरी केली.धावत्या ट्रेनमधून उडी मारुन हे दोन्ही चोर फरार झाले. त्यांच्यापाठोपाठ ऐकल यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. मात्र प्लॅटफॉर्मवर एकही पोलीस नव्हता. अंधेरी स्टेशनला ट्रेन थांबल्यानंतर बाजूच्या डब्ब्यातील प्रवाशांनी ऐकल यांना मदत केली. प्रवशांच्या सुरक्षिततेची काळजी न घेणाऱ्या रेल्वेला ऐकल यांनी ग्राहक मंचात खेचले. आरक्षित डब्ब्यात कोणीही चढू नये, याची खबरदारी घेण्याचे काम टीसीचे असतानाही त्या दिवशी संबंधित डब्यात टीसी नव्हता. त्याशिवाय प्लॅटफॉर्मवर एकही पोलीस नव्हता. रेल्वेने कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई, चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत आणि या प्रसंगामुळे मुलाच्या मनावर परिणाम झाला म्हणून त्याला डॉक्टरांकडून उपाय करण्यासाठी आलेला खर्च इत्यादी मिळून पश्चिम रेल्वेने १७ लाख ९० हजार ३७३ रुपये द्यावेत, असेही ऐकल यांनी याचिकेत नमूद केले आहे.मात्र पश्चिम रेल्वेने ऐकल यांची मागणी साफ फेटाळली. ‘रेल्वे लवादाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. ग्राहक मंचाच्या अखत्यारित ही केस येत नाही. तसेच ऐकल यांचे सामान बुक केलेले नव्हते. बुकिंग केलेले सामान चोरीला किंवा गहाळ झाल्यास रेल्वे त्याची जबाबदारी घेते. त्यामुळे ऐकल यांना त्यांचे दागिने, पर्स आणि मोबाईल चोरीगेल्याबद्दल नुकसान भरपाई दिली जाऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद रेल्वेच्या वकिलांनी ग्राहक मंचाकडे केला. मात्र ग्राहक मंचाने त्यांचा युक्तिवाद फेटाळत रेल्वेने कर्तव्यात कसूर केल्याचे म्हटले.