शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

लातूरसाठी मिरजहून रेल्वेने पाणी आणणार

By admin | Updated: April 5, 2016 18:29 IST

उन्हाळयाची तीव्रता वाढत चाललेली असताना दिवसेंदिवस लातूरमधील परिस्थिती गंभीर रुप धारण करु लागली आहे.

ऑनलाइन लोकमत लातूर, दि. ५ - न्हाळयाची तीव्रता वाढत चाललेली असताना दिवसेंदिवस लातूरमधील परिस्थिती गंभीर रुप धारण करु लागली आहे. लातूरमधील जलसाठे आटत चालले असून, अपु-या पाण्यामुळे लातूरच्या जनतेचे प्रंचड हाल होत आहेत. लातूरची पाण्याची गरज भागवण्यासाठी आता मिरजहून रेल्वेने पाणी आणण्यात येणार आहे. लातूरच्या दौ-यावर असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली. एकनाथ खडसे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आज लातूरचा दौरा केला. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसात दोन ट्रेनभरुन लातूरसाठी पिण्याचे पाणी आणले जाईल. लातूरमध्ये टॅंकरच्या पाण्यासाठी लोक रात्र-रात्र जागून काढत आहेत.

टँकरच्या पाण्यासाठी गावक-यांना वीस-वीस किमीपर्यंत पायपीट करावी लागत आहे. मिळणारे पाणी फक्त पिण्यासाठी पुरत असून, कपडे किंवा आंघोळीपुरताही पाणी मिळत नसल्याची तक्रार महिलांनी केली. लातूरप्रमाणेच परभणीमध्येही पाण्यावरुन हाणामारीचे प्रसंग उदभवू नये यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

मात्र यापरिस्थितीतही राजकरणही परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाचा राजकारण करत आहे. लातूरमध्ये पाण्यासाठी अनेकांनी आपले गाव सोडले आहे. पाण्याला जीवन का म्हणतात ? ती लातूरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येईल.                 

 

( सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)