शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

रेल्वे सुरक्षा बलाकडे नाहीत अग्निशमनचे नंबर

By admin | Updated: August 27, 2016 03:22 IST

विरारच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे क्रमांक नसल्याची माहिती समोर आली आहे.

विरार : विरारच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे क्रमांक नसल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात विरार रेल्वे स्थानकातील फलाटावर लागलेल्या आगीनंतर मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बलाने अग्निशमन दलाऐवजी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला पाचारण केले होते.मागील सोमवारी विरारच्या फलाट क्रमांक १ वर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी आग लागली होती. गर्दीची वेळ असल्याने एकच हलकल्लोळ उडाला होता. आग लागताच स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करणे आवश्यक असते. परंतु रेल्वे सुरक्षा बलाकडे स्थानिक अग्निशमन दलाचे नंबर नसल्याने त्याने आग लागल्यावर रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला या आगीबाबत कळवले. नियंत्रणकक्षाने पुढील हालचाली केल्या. सव्वा सात वाजता महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आम्ही आपतकालीन परिस्थितीत स्थानिक यंत्रणांना संपर्क करत बसलो तर वेळ जातो. त्यामुळे आमच्या नियंत्रण कक्षाला कळवत असतो असे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक यशवंत प्रजापती यांनी सांगितले. नियंत्रण कक्षाला कळवल्यास तत्पर कारवाई होते असाही त्यांनी दावा केला.यामुळे रेल्वे सुरक्षा बलाचाच हलगर्जीपणा आणि गलथान कारभार समोर आला आहे. जर रेल्वे सुरक्षा बलाने तात्काळ स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण केले असते तर आणखी लवकर मदत मिळून आग लवकरच आटोक्यात आणता आली असती असे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)