शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी मिरजेतून लातूरला धावणार रेल्वे

By admin | Updated: April 6, 2016 00:19 IST

हिरवा कंदील : एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्याकडून यंत्रणेची पाहणी

मिरज : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी आता मिरजेतून रेल्वे धावणार आहे. मंगळवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मिरजेत जिल्हा प्रशासन व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. महिला वबालकल्याणमंत्री व लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत मिरज रेल्वेस्थानकात पाणी वाहतूक व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली.मिरज विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महसूलमंत्री खडसे यांनी मिरजेतून तातडीने लातूरला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. के. गरंडे यांना दिल्या. पंढरपुरातून लातूरला टँकरने पाणी नेण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. आता मिरजेतून पाणी नेण्यात येणार असल्याने रेल्वेच्या परवानगीचे आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात येतील. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. मिरजेतील रेल्वेची पाणी योजना जलशुध्दीकरण केंद्राची त्यांनी माहिती घेतली. रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी करणाऱ्या शशांक जाधव यांनी दररोज ४५ लाख लिटर क्षमतेच्या मिरजेतील रेल्वे पाणीपुरवठा योजनेतून दररोज ५० लाख लिटर पाणी उपसा व शुध्दीकरण करता येईल, असे सांगितले. मिरज रेल्वेस्थानक व कर्मचारी वसाहतीला दररोज १५ लाख लिटर पाणी लागते. उर्वरित पाणी टँकरव्दारे लातूरला पाठविता येणे शक्य असल्याचे सांगितले. प्रत्येकी २४ हजार लिटर क्षमतेचे ५० टँकर भरण्यासाठी आठ तास वेळ लागणार असल्याने एकाचवेळी २४ टँकर भरतील, अशा पाईपलाईनची व उच्च क्षमतेच्या पंपाची व्यवस्था करण्याच्या सूचना खडसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार रेल्वे यार्डात सुमारे एक किलोमीटर लांबीची पाईपलाईनची व्यवस्था करून टँकर भरण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने आठ दिवसांत पाणी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले. वारणा धरणात पुरेसा पाणी साठा असून, पुढील सहा महिने पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याने लातूरला पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजीवकुमार, आमदार संभाजीराव पाटील, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता टी. पी. सूर्यवंशी, रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अभियंता एस. नागराळे, स्थानक अधीक्षक व्ही. रमेश यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) \दररोज पाणी जाणार : एकनाथ खडसेमिरजेतील रेल्वेच्या जलशुद्धिकरण केंद्रातून दररोज ५० टँकरद्वारे सुमारे २५ लाख लिटर पाणी लातूरला नेण्यात येईल. लातूर येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. लातूरच्या पाणीटंचाईबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येईल; मात्र सद्य:स्थितीत मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री खडसे यांनी मंगळवारी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली.वारणा धरणात सहा महिने पुरेल एवढा ११ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. मिरजेत रेल्वेच्या पाणी योजनेतून टँकर भरण्याची व्यवस्था आहे. यातून दर तीन दिवसांनी लातूर शहराला पाणीपुरवठा होईल. मिरजेतून लातूरला रेल्वे पोहोचण्यासाठी दहा तास लागणार आहेत. मिरजेतून टँकरने पाणी नेण्यासाठी आवश्यक प्राथमिक बाबींची पूर्तता करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आठ दिवसांत रेल्वे टँकर उपलब्ध झाल्यानंतर लातूरला पाणीपुरवठा सुरु होईल.