शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने पाणी नेण्याचा प्रस्ताव गुंडाळला !

By admin | Updated: September 9, 2015 00:20 IST

लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव

औरंगाबाद : लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी लातुरात रेल्वे स्थानक आणि विहिरींची पाहणी केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. लातूरला वेळेत पाणीपुरवठा होईल व तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, अशा पर्यायांचा विचार सुरू आहे. रेल्वेने पाणी देण्याचा शेवटचा पर्याय असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले. प्रधान सचिवांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी पाहणी केली असली तरी त्यांच्याशी सुद्धा सर्व पर्यायांवर चर्चा करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव खर्चिक असल्याने इतर पर्याय निवडण्याच्या सूचना प्रशासनाला वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. दांगट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी लातूर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांची बैठक झाली. त्यात भंडारवाडी प्रकल्पाच्या योजनेसाठी ३० कोटींचा निधी देण्याचे ठरले. तेथून २ एमएलडी पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मनपाने या योजनेसाठी निविदा काढल्या होत्या; परंतु ठेकेदार पुढे न आल्यामुळे जीवन प्राधिकरणाकडे योजनेचे काम देण्याचे ठरले.एकीकडे दांगट यांनी रेल्वेचा पर्याय गुंडाळल्याचे संकेत दिले असतानाच पाणीपुरवठा विभागाचे राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी मंगळवारी रेल्वे स्थानक व रेल्वेने आणलेले पाणी ज्या विहिरीत टाकले जाणार आहे, त्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीची पाहणी केली. जलशुध्दीकरण केंद्र, बॅरेजस, भंडारवाडी मध्यम प्रकल्पाची पाहणी करण्यापूर्वी राजेशकुमार यांच्यासह शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली़ त्यातही रेल्वेच्या पाण्याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)चार पर्याय -नागझरी प्रकल्पात विहीर घेणे-मांजरा धरणपात्रात विहिरी घेणे-भंडारवाडीची रखडलेली योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करणे-उस्मानाबाद येथून जलवाहिनीने पाणी आणणेलातूरकरांना दररोज ५० एमलएलडी पाणी लागते. मात्र महिन्यातून दोन वेळा म्हणजे १०० एमएलडी पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.