शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

रेल्वेने पाणी नेण्याचा प्रस्ताव गुंडाळला !

By admin | Updated: September 9, 2015 00:20 IST

लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव

औरंगाबाद : लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी लातुरात रेल्वे स्थानक आणि विहिरींची पाहणी केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. लातूरला वेळेत पाणीपुरवठा होईल व तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, अशा पर्यायांचा विचार सुरू आहे. रेल्वेने पाणी देण्याचा शेवटचा पर्याय असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले. प्रधान सचिवांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी पाहणी केली असली तरी त्यांच्याशी सुद्धा सर्व पर्यायांवर चर्चा करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव खर्चिक असल्याने इतर पर्याय निवडण्याच्या सूचना प्रशासनाला वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. दांगट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी लातूर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांची बैठक झाली. त्यात भंडारवाडी प्रकल्पाच्या योजनेसाठी ३० कोटींचा निधी देण्याचे ठरले. तेथून २ एमएलडी पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मनपाने या योजनेसाठी निविदा काढल्या होत्या; परंतु ठेकेदार पुढे न आल्यामुळे जीवन प्राधिकरणाकडे योजनेचे काम देण्याचे ठरले.एकीकडे दांगट यांनी रेल्वेचा पर्याय गुंडाळल्याचे संकेत दिले असतानाच पाणीपुरवठा विभागाचे राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी मंगळवारी रेल्वे स्थानक व रेल्वेने आणलेले पाणी ज्या विहिरीत टाकले जाणार आहे, त्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीची पाहणी केली. जलशुध्दीकरण केंद्र, बॅरेजस, भंडारवाडी मध्यम प्रकल्पाची पाहणी करण्यापूर्वी राजेशकुमार यांच्यासह शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली़ त्यातही रेल्वेच्या पाण्याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)चार पर्याय -नागझरी प्रकल्पात विहीर घेणे-मांजरा धरणपात्रात विहिरी घेणे-भंडारवाडीची रखडलेली योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करणे-उस्मानाबाद येथून जलवाहिनीने पाणी आणणेलातूरकरांना दररोज ५० एमलएलडी पाणी लागते. मात्र महिन्यातून दोन वेळा म्हणजे १०० एमएलडी पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.