शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

रेल्वेने पाणी नेण्याचा प्रस्ताव गुंडाळला !

By admin | Updated: September 9, 2015 00:20 IST

लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव

औरंगाबाद : लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याचा प्रस्ताव जवळपास गुंडाळल्यात जमा असून, इतर चार पर्यायांचा विचार सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी लातुरात रेल्वे स्थानक आणि विहिरींची पाहणी केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. लातूरला वेळेत पाणीपुरवठा होईल व तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, अशा पर्यायांचा विचार सुरू आहे. रेल्वेने पाणी देण्याचा शेवटचा पर्याय असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी स्पष्ट केले. प्रधान सचिवांनी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी पाहणी केली असली तरी त्यांच्याशी सुद्धा सर्व पर्यायांवर चर्चा करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव खर्चिक असल्याने इतर पर्याय निवडण्याच्या सूचना प्रशासनाला वरिष्ठांकडून मिळाल्या आहेत. दांगट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी लातूर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग अभियंत्यांची बैठक झाली. त्यात भंडारवाडी प्रकल्पाच्या योजनेसाठी ३० कोटींचा निधी देण्याचे ठरले. तेथून २ एमएलडी पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मनपाने या योजनेसाठी निविदा काढल्या होत्या; परंतु ठेकेदार पुढे न आल्यामुळे जीवन प्राधिकरणाकडे योजनेचे काम देण्याचे ठरले.एकीकडे दांगट यांनी रेल्वेचा पर्याय गुंडाळल्याचे संकेत दिले असतानाच पाणीपुरवठा विभागाचे राज्याचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी मंगळवारी रेल्वे स्थानक व रेल्वेने आणलेले पाणी ज्या विहिरीत टाकले जाणार आहे, त्या एस़आऱदेशमुख यांच्या शेतातील विहिरीची पाहणी केली. जलशुध्दीकरण केंद्र, बॅरेजस, भंडारवाडी मध्यम प्रकल्पाची पाहणी करण्यापूर्वी राजेशकुमार यांच्यासह शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली़ त्यातही रेल्वेच्या पाण्याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)चार पर्याय -नागझरी प्रकल्पात विहीर घेणे-मांजरा धरणपात्रात विहिरी घेणे-भंडारवाडीची रखडलेली योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करणे-उस्मानाबाद येथून जलवाहिनीने पाणी आणणेलातूरकरांना दररोज ५० एमलएलडी पाणी लागते. मात्र महिन्यातून दोन वेळा म्हणजे १०० एमएलडी पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.