शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

‘बालक-पालक’भेटीत रेल्वे पोलिसांचे योगदान

By admin | Updated: January 26, 2016 03:05 IST

मुंबईचे आकर्षण, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा ओरडा यासह अनेक कारणांमुळे घरातून पळून आलेल्या किंवा पालकांसह रेल्वे स्थानकात येताच हरविलेल्या बालकांना

मुंबई : मुंबईचे आकर्षण, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा ओरडा यासह अनेक कारणांमुळे घरातून पळून आलेल्या किंवा पालकांसह रेल्वे स्थानकात येताच हरविलेल्या बालकांना (१८ वर्षांखालील) यशस्वीरीत्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची कामगिरी जानेवारी महिन्यातील अवघ्या २४ दिवसांतच रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) पार पाडली आहे. यात १ हजार १0२ बालकांपैकी १ हजार १३ बालके स्वगृही परतल्याची माहिती देण्यात आली. यासाठी आॅपरेशन स्माइल नावाने ही कामगिरी पार पाडण्यात आली. मुंबई उपनगरीय रेल्वेचा पसारा हा चर्चगेट ते डहाणू, सीएसटी ते कर्जत, आणि हार्बरपर्यंत आहे. या तीनही मार्गांवरून दररोज ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. हा प्रवास करताना अनेक रेल्वे स्थानकांवर विविध कारणांमुळे कोणी घरातून पळून आल्याने तर गर्दीमुळे पालकांचा हात सुटल्याने बालके हरविल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) होते. २0१६मधील १ ते २४ जानेवारीपर्यंत तब्बल १ हजार १0२ मुले-मुली हरविल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे झाली. मात्र याच २४ दिवसांत त्यांच्या पालकांशी संपर्क साधून १ हजार १३ मुला-मुलींना ताब्यात देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे हरविलेल्यांमध्ये ७५३ मुलांचा तर ३४९ मुलींचा समावेश होता. मुंबई सेंट्रल आणि सीएसटी स्थानकात हरविलेल्या बालकांची सर्वाधिक नोंद झाली आहे. मुंबई सेंट्रलमध्ये २६६ तर सीएसटी २३६ बालके हरविल्याची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. दादरमध्ये १५६ बालके हरविली होती. बाल कल्याण समितीसमोर ८९ बालकांची हजेरी१ हजार १0२ बालकांपैकी १ हजार १३ बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तर ८९ बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)