शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रेल्वेत अडीच लाखांचा ऐवज लंपास

By admin | Updated: November 15, 2015 23:36 IST

पोलिसांत गुन्हा : जयपूर, जोधपूर-बंगलोर एक्स्प्रेसमध्ये चोरी

मिरज : जयपूर-बंगलोर व जोधपूर-बंगलोर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन प्रवाशांचा अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या रेल्वेगाड्यांत प्रवाशांची गर्दी असल्याने चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. जयपूर-बंगलोर विशेष एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी वातानुकूलित बोगीतून महिला पत्रकाराचे दोन लाखांचे दागिने चोरून नेले.शनिवारी पहाटे मिरजेकडे येणाऱ्या जयपूर-बंगलोर या दिवाळी सुटीनिमित्त सोडण्यात आलेल्या विशेष एक्स्प्रेसमध्ये ए-१ वातानुकूलित बोगीतील दीपा अमितकुमार श्रीवास्तव (वय २८, रा. बंगलोर) या महिला पत्रकार पतीसह वसई ते बंगलोर प्रवास करीत असताना लोणावळा ते सातारादरम्यान त्यांच्या पर्समधील दागिने अज्ञातांनी चोरले. सातारा स्थानक सोडल्यानंतर पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर दीपा श्रीवास्तव यांनी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला चोरीबाबत माहिती दिली. जयपूर एक्स्प्रेस मिरजेत आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी चोरीची तक्रार नोंद केली. श्रीवास्तव दाम्पत्य झोपेत असताना त्यांच्या पर्समधील अडीच तोळे हिरेजडीत मंगळसूत्र, चार अंगठ्या, (पान १ वरुन) चार कर्णफुले असा आठ तोळे सोन्याचा दोन लाख पाच हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार आहे. दिवाळी सुटीच्या हंगामात आरक्षित व जनरल बोगीत गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होत आहेत. मात्र, वातानुकूलित बोगीतही चोरट्यांनी डल्ला मारल्याने पोलीस चक्रावले आहेत. जोधपूर-बंगलोर एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीतून अहमदाबाद ते पुणे प्रवास करणारे बंगलोरचे व्यापारी नवीनकुमार रतनचंद जैन (वय ५०) यांची बॅग चोरट्यांनी लोणावळा ते पुणेदरम्यान चोरून नेली. बॅगेत बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोख दोन हजार, कपडे असा १५ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज होता. चोरीबाबत जैन यांनी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली आहे. जोधपूर एक्स्प्रेसमध्येच प्रवास करणारे प्रशांत पांडे (४२, रा. बंगलोर) यांचीही बॅग चोरट्यांनी लंपास केली. बॅगेत सोन्याचे नाणे, रोख रक्कम असा १६ हजार ५०० रुपयांचा माल होता. रेल्वेच्या आरक्षित बोगीसह वातानुकूलित व सर्वसाधारण बोगीतही चोऱ्या होत असल्याने एक्स्प्रेसमधून रात्रीचा प्रवास प्रवाशांना चांगलाच महागात पडत आहे. दिवाळी सुटीत परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला मोठी गर्दी असल्याने लोणावळा ते पुणेदरम्यान रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. दरवर्षी दिवाळीच्या हंगामात प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या टोळ्या रात्रीच्या रेल्वेगाड्यांत धुमाकूळ घालत आहेत. एक आठवड्यापूर्वी जोधपूर एक्स्प्रेसमध्ये चोरट्यांनी प्रवाशांच्या बॅगा लंपास करून लाखोंचा ऐवज चोरला होता. मात्र, रेल्वे पोलीस व सुरक्षा दलाने चोऱ्यांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केली नसल्याने त्यानंतर पुन्हा चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत. रात्रीच्या रेल्वेगाड्यांत सशस्त्र पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचा बंदोबस्त असतानाही चोऱ्यांचे प्रकार सुरूच आहेत. गतवर्षीही दिवाळी हंगामात चोरट्यांनी रात्रीच्या रेल्वेगाड्यांत महिनाभर धुमाकूळ घालून प्रवाशांची लूटमार केली होती.धावत्या रेल्वेत फिर्यादरेल्वे पोलिसांनी मिरज ते बेळगावदरम्यान धावत्या रेल्वेत श्रीवास्तव यांची चोरीची फिर्याद घेतली. दीपा श्रीवास्तव यांनी वातानुकूलित बोगीतील रेल्वे कर्मचारी व प्रवाशांवर चोरीचा संशय घेतल्याने मिरजेतून बेळगावपर्यंत पोलिसांनी सर्व प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली, मात्र चोरीला गेलेले दागिने सापडले नाहीत. जयपूर एक्स्प्रेसच्या आरक्षित वातानुकूलित बोगीतून प्रवास करणारा कोणताही प्रवासी साताऱ्यापासून उतरलेला नाही. त्यामुळे पुणे स्थानकापूर्वी चोरीचा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.