शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

रेल्वेच्या धरणाचे पाणी ठाण्यालाही

By admin | Updated: April 24, 2016 04:40 IST

नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात टिष्ट्वट केल्यानंतर

ठाणे : नवी मुंबईच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या डी धरणाचे पाणी आता नवी मुंबईबरोबरच ठाण्यालाही मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात टिष्ट्वट केल्यानंतर या धरणाची पाहणी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि ठाणे महापालिका आयुक्त सोमवारी करणार आहेत. कळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीची पाणीकपात ६० तासांची झाल्याने सलग तीन दिवस येथील रहिवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा आणि रबाळेच्या दरम्यान पारसिक पुलाच्या मागे बंद असलेले रेल्वेचे डी धरण उपयोगात आणण्याबाबत ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येत होती. यासाठी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेकडे पत्रव्यवहारदेखील केला होता. तसेच ठाणे शहर मनसेचे प्रदीप सावर्डेकर यांनीदेखील पालिका आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी या धरणाचे पाणी नवी मुंबईला वळवण्यात मोलाचा वाटा उचलणारे खासदार राजन विचारे यांचा राष्ट्रवादी आणि मनसेने निषेध केला. त्यामुळे त्याच्या पाण्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले होते. इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे ट्रॅक हा ठाण्याच्या पुढे न्यायचा होता, त्या वेळी येथे डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून मजूर आणले गेले होते. या मजुरांच्या निवाऱ्याची व्यवस्था या डोंगरावर केली होती. परंतु, त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायम होता, तेव्हा त्यांच्याकरिता रेल्वेने हे डी धरण बांधले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेल्या सूचनेनंतर आता सोमवारी या धरणाची संयुक्त पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल करणार आहेत. यास आयुक्तांनी दुजोरा दिला आहे. पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथ येथेही रेल्वेच्या मालकीचे आणखी एक धरण आहे. ते जीआयपी टँक (गे्रट इंडियन पेनिनसुला) या तत्कालीन रेल्वे कंपनीच्या नावाने ओळखले जाते. त्याची क्षमता ६ एमएलडी इतकी आहे. सध्या त्याच्या पाण्यावर ‘रेल नीर’ हा रेल्वेचा मिनरल वॉटरचा प्रकल्प सुरू आहे.04 दशलक्षलीटर एवढी या धरणाची क्षमता असून, त्याची दुरुस्ती केल्यास ते सुमारे १२ ते १५ दशलक्षलीटर क्षमतेचे होऊ शकणार आहे. त्याच्या जमिनीचा मालकी हक्क रेल्वेकडे असून, ते मुंब्य्राच्या डोंगराच्या मागे रबाळे व पारसिकच्या मध्ये आहे. त्याला ‘डी धरण’ म्हणून संबोधले जाते.