शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी रेल रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 16:32 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती व शेतकरी कर्जमुक्तीसाठी गुरुवारी वर्ध्यातील सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 6 - वर्धा - स्वतंत्र विदर्भ राज्य आमच्या हक्काचा...ह्ण अशा गगणभेदी घोषणा देत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन सेवाग्राम येथील रेल्वे स्थानकावर तब्बल अर्धातास रेल्वे गाडी रोखून पुन्हा वेगळ्या विदर्भाची मागणी ऐरणीवर आणली. सेवाग्राम मार्गावरील एसटी विभाग नियंत्रक कार्यालयासमोरील एका लॉनमधून भर दुपारी १२.३० वाजता विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडीच्या अध्यक्ष अ‍ॅड. नंदाताई पराते, महिला आघाडी अध्यक्ष पश्चिम विदर्भ संध्याताई इंगोले व युवा आघाडी पश्चिम विदर्भ प्रमुख प्रदीप धामणकर यांच्या नेतृत्त्वात मोर्चाला प्रारंभ झाला. उन्हाची तमा न बाळगता विदर्भातील जिल्ह्यांतून आलेले सुमारे दोन हजारांवर महिला-पुरुष सहभागी होताच मोर्चाला भव्य स्वरुप आले. मोर्चा आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाखालून आगेकूच करीत थेट सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहचला. यानंतर काही आंदोलनकर्ते रेल्वे रुळावर आडवे झाले.

नागपूरकडून माल गाडी येताच कार्यकर्त्यांनी त्या दिशेने धाव घेत तिला अर्धा तास रोखून धरले. सुमारे १५ मिनिटानंतर चंद्रपूरकडून आलेली सुपर एक्स्प्रेस सेवाग्राम रेल्वे स्थानकावर थांबली असता तिलाही सुमारे १५ मिनिटे रोखून धरली. दरम्यान, ह्यविदर्भ आमच्या हक्काचा ...ह्ण अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सेवाग्राम रेल्वे स्थानकाचा परिसर व्यापून टाकला होता. कार्यकर्त्यांच्या हातातील विदर्भाचा नकाशा व त्यावर जय विदर्भ नमुद असलेले फलक लक्ष वेधून घेत होते. या आंदोलनाने स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा एकदा बुलंद केली.

या आंदोलनात चंद्रपूरहून माजी विधानसभा उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रभाकर दिवे, वर्धेतून माजी आमदार सरोजताई काशीकर, निळकंठ घवघवे, मधूकर हरणे, गंगाधार मुटे, शैलाताई देशपांडे, उत्तम देवधे, सतीश दाणी, नागपूरहून अरुण केदार, अरविंद देशमुख, धर्मराज रेवतकर, निलकंठ घवघवे, डॉ. दीपक मुंढे, यवतमाळहून विजय निवल, अ‍ॅड. अजय चमेडिया, गडचिरोलीहून राजेंद्रसिह ठाकूर, गोंदियाहून अ‍ॅड. अर्चना नंदघले, अमरावतीहून दिलीप भोयर, वाशिमहून ओमप्रकाश तापडिया असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.

आंदोलन अतिशय शांततामय पद्धतीने पार पडले असले तरी रेल्वे स्थानक ते एसटी विभाग नियंत्रक कार्यालय या सुमारे दीड किमी अंतरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे स्वत: आंदोलनावर नियंत्रण ठेवून होते. आंदोलनाचे स्वरुप विचारात घेता पोलिसांनी सकाळपासूनच सेवाग्राम रेल्वे स्थानक व परिसरात सुमारे ५०० पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये पोलीस अधीक्षक गोयल यांच्यासह पोलीस उपअधीक्षक(गृह) रवींद्र किल्लेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, पोलीस निरीक्षक पराग पोटे, विजय मगर, राजेंद्र शिरतोडे, सहायक पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर ही मंडळी पोलीस ताफ्यासह प्रत्येक घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. मुंबईहून रेल्वे सुरक्षा विशेष बलाची ७० जवानांची तुकडी तैनात करण्यात आली होती. नागपूरहूनसुद्धा पोलिसांची कुमक मागविण्यात आलीहोती. आंदोलन शांततामय मार्गाने पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वासघेतला.

विदर्भवाद्यांच्या सहा प्रमुख मागण्या- स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरीत निर्माण करा.- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा.- मायक्रो फायनांसतर्फे कर्जवसुलीसाठी सुरू असलेले महिलांच्या गटाचे शोषण थांबवा.- विदर्भातील तरुणांना महाराष्ट्रातील विदर्भाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातअधिकार म्हणून शासकीय नोकऱ्या द्या.- महावितरणने केलेली अन्यायपूर्ण १२ टक्केची दरवाढ कमी करा.- ५० टक्के नफ्यासह शेतमालाला किफायतशीर भाव द्या.वेगळा विदर्भ हा केंद्र सूचीतला विषय आहे म्हणून सरळ केंद्राला सरळ निरोप द्यायचे काम झालेले आहे. आता सगळ्या जनतेच्या स्वाधीन हे आंदोलन करतो. आता पुढील जबाबदारी केंद्र सरकारची आहे.- अ‍ॅड. वामनराव चटप, विदर्भ आंदोलनाचे नेते.⁠⁠⁠⁠