शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

झुरळामुळे रेल्वेला १५ हजारांचा दंड

By admin | Updated: July 20, 2016 21:50 IST

रेल्वेच्या डब्यात झुरळांचा वावर असल्यामुळे प्रवाशाला प्रवासादरम्यान मानसिक त्रास झाला. तक्रारकर्त्याने मौखिक आणि लेखी तक्रार केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यावर

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.20  -  रेल्वेच्या डब्यात झुरळांचा वावर असल्यामुळे प्रवाशाला प्रवासादरम्यान मानसिक त्रास झाला. तक्रारकर्त्याने मौखिक आणि लेखी तक्रार केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, असा ठपका ठेवत अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूरने मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि दक्षिण-मध्य रेल्वे, चेन्नईचे महाव्यवस्थापक यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम वैयक्तिक अथवा संयुक्तिक स्वरूपात एक महिन्याच्या आत भरायची आहे. तक्रारकर्ते जे. राधाक्रिष्णन जयराम (५७) आणि ललिता राधाक्रिष्णन (५४) रा. शंकरनगर यांनी रेल्वेच्या राखीव कोचमधून प्रवास करताना झुरळांमुळे झालेल्या त्रासामुळे नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-१९९६ चे कलम-१२ खाली मंचाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्ते व त्यांची पत्नी हे तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये एसी-२ टायरने चेन्नई ते नागपूर असा प्रवास २७ सप्टेंबर २०१२ ला कोच क्र. ए-३ मध्ये बर्थ क्र. ४ व ५ वर करीत होते. प्रवासादरम्यान त्यांना डब्यात झुरळ वावरत असल्याचे दिसले. झुरळांमुळे त्यांना व डब्यातील इतर प्रवाशांना बराच त्रास झाला व ते नीट झोपू शकले नाही. प्रवासादरम्यान त्यांनी प्रत्येक स्थानकावर रेल्वेतील कर्मचाऱ्यांकडे याबद्दल तक्रारी केल्या व एक लेखी तक्रार तक्रारपेटीत टाकली. परंतु रेल्वेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने त्यावर काहीही कारवाई केली नाही. ही रेल्वेच्या सेवेतील कमतरता होती. तक्रारीवर सुनावणी करताना मंचचे अध्यक्ष शेखर मुळे आणि सदस्य नितीन घरडे यांनी उपरोक्त आदेश दिले.