शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

झुरळामुळे रेल्वेला १५ हजारांचा दंड

By admin | Updated: July 20, 2016 21:50 IST

रेल्वेच्या डब्यात झुरळांचा वावर असल्यामुळे प्रवाशाला प्रवासादरम्यान मानसिक त्रास झाला. तक्रारकर्त्याने मौखिक आणि लेखी तक्रार केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यावर

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.20  -  रेल्वेच्या डब्यात झुरळांचा वावर असल्यामुळे प्रवाशाला प्रवासादरम्यान मानसिक त्रास झाला. तक्रारकर्त्याने मौखिक आणि लेखी तक्रार केल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, असा ठपका ठेवत अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूरने मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि दक्षिण-मध्य रेल्वे, चेन्नईचे महाव्यवस्थापक यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम वैयक्तिक अथवा संयुक्तिक स्वरूपात एक महिन्याच्या आत भरायची आहे. तक्रारकर्ते जे. राधाक्रिष्णन जयराम (५७) आणि ललिता राधाक्रिष्णन (५४) रा. शंकरनगर यांनी रेल्वेच्या राखीव कोचमधून प्रवास करताना झुरळांमुळे झालेल्या त्रासामुळे नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ग्राहक संरक्षण कायदा-१९९६ चे कलम-१२ खाली मंचाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्ते व त्यांची पत्नी हे तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये एसी-२ टायरने चेन्नई ते नागपूर असा प्रवास २७ सप्टेंबर २०१२ ला कोच क्र. ए-३ मध्ये बर्थ क्र. ४ व ५ वर करीत होते. प्रवासादरम्यान त्यांना डब्यात झुरळ वावरत असल्याचे दिसले. झुरळांमुळे त्यांना व डब्यातील इतर प्रवाशांना बराच त्रास झाला व ते नीट झोपू शकले नाही. प्रवासादरम्यान त्यांनी प्रत्येक स्थानकावर रेल्वेतील कर्मचाऱ्यांकडे याबद्दल तक्रारी केल्या व एक लेखी तक्रार तक्रारपेटीत टाकली. परंतु रेल्वेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने त्यावर काहीही कारवाई केली नाही. ही रेल्वेच्या सेवेतील कमतरता होती. तक्रारीवर सुनावणी करताना मंचचे अध्यक्ष शेखर मुळे आणि सदस्य नितीन घरडे यांनी उपरोक्त आदेश दिले.