शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

नव्या आरक्षण नियमावलीमुळे रेल्वेला फायदा

By admin | Updated: April 3, 2015 02:23 IST

रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रे

मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रेल्वेला झाला. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेला एकूण ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण करताना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. यामध्ये दलालांचा हस्तक्षेप असल्यानेच प्रवाशांना तिकीट मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. हे पाहता दलालांची रेल्वे आरक्षणातील दलाली रोखण्यासाठी आणि भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ६0 दिवस अगोदर असलेले आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय झाला. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने प्रवाशांकडून तिकीट आरक्षण मिळविण्यासाठी तिकीट खिडक्यांवर आणि आयआयसीटीच्या वेबसाईटवर एकच झुंबड उडाली. त्यामुळे नव्या आरक्षण नियमावलीच्या पहिल्याच दिवशी देशभरात दुपारी ३ वाजेपर्यंत १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटांचे आरक्षण झाले. तर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरही आरक्षण दुप्पट वाढले. १ एप्रिलच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर एकूण ७ लाख १0 हजार प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटांचे आरक्षण झाल्याने रेल्वेच्या तिजोरीतही घसघशीत रक्कम पडली. या तिन्ही रेल्वे विभागांना मिळून ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.