शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

नव्या आरक्षण नियमावलीमुळे रेल्वेला फायदा

By admin | Updated: April 3, 2015 02:23 IST

रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रे

मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रेल्वेला झाला. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेला एकूण ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण करताना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. यामध्ये दलालांचा हस्तक्षेप असल्यानेच प्रवाशांना तिकीट मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. हे पाहता दलालांची रेल्वे आरक्षणातील दलाली रोखण्यासाठी आणि भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ६0 दिवस अगोदर असलेले आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय झाला. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने प्रवाशांकडून तिकीट आरक्षण मिळविण्यासाठी तिकीट खिडक्यांवर आणि आयआयसीटीच्या वेबसाईटवर एकच झुंबड उडाली. त्यामुळे नव्या आरक्षण नियमावलीच्या पहिल्याच दिवशी देशभरात दुपारी ३ वाजेपर्यंत १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटांचे आरक्षण झाले. तर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरही आरक्षण दुप्पट वाढले. १ एप्रिलच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर एकूण ७ लाख १0 हजार प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटांचे आरक्षण झाल्याने रेल्वेच्या तिजोरीतही घसघशीत रक्कम पडली. या तिन्ही रेल्वे विभागांना मिळून ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.