शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

नव्या आरक्षण नियमावलीमुळे रेल्वेला फायदा

By admin | Updated: April 3, 2015 02:23 IST

रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रे

मुंबई : रेल्वेचे तिकीट आरक्षण ६0 दिवसांच्या ऐवजी १२0 दिवस अगोदर करण्याचा नवा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात आला आणि या नियमाचा मोठा फायदा रेल्वेला झाला. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेला एकूण ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण करताना मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्टचा सामना करावा लागतो. यामध्ये दलालांचा हस्तक्षेप असल्यानेच प्रवाशांना तिकीट मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. हे पाहता दलालांची रेल्वे आरक्षणातील दलाली रोखण्यासाठी आणि भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून ६0 दिवस अगोदर असलेले आरक्षण १२0 दिवस अगोदर करण्याचा निर्णय झाला. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याने प्रवाशांकडून तिकीट आरक्षण मिळविण्यासाठी तिकीट खिडक्यांवर आणि आयआयसीटीच्या वेबसाईटवर एकच झुंबड उडाली. त्यामुळे नव्या आरक्षण नियमावलीच्या पहिल्याच दिवशी देशभरात दुपारी ३ वाजेपर्यंत १0 लाखांपेक्षा अधिक तिकिटांचे आरक्षण झाले. तर मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवरही आरक्षण दुप्पट वाढले. १ एप्रिलच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेवर एकूण ७ लाख १0 हजार प्रवाशांनी तिकीट आरक्षण केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकिटांचे आरक्षण झाल्याने रेल्वेच्या तिजोरीतही घसघशीत रक्कम पडली. या तिन्ही रेल्वे विभागांना मिळून ३६ कोटी ५४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.