शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सत्तेसाठी भाजपाकडून जाती-धर्मात तेढ , राहुल गांधी यांचा हल्लाबोल; नांदेड, परभणीत काँग्रेसने केले जोरदार शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 05:03 IST

देशात जातीय विष पेरले जात असून, हरयाणात जाटविरोधी इतर तर महाराष्ट्रात मराठाविरोधी अमराठा असा वाद पेटवला जात आहे़

नांदेड/परभणी : देशात जातीय विष पेरले जात असून, हरयाणात जाटविरोधी इतर तर महाराष्ट्रात मराठाविरोधी अमराठा असा वाद पेटवला जात आहे़ सत्तेसाठी भाजपा द्वेष पेरत असून त्यापासून सावध राहा, असा घणाघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड व परभणी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्द्यांवरून त्यांनी भाजपा व मोदी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून राज्यात आणि देशात एनडीएचे सरकार आहे़ या काळात महाराष्ट्रात तब्बल ९ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली आहे़ गुजरातमध्ये नॅनो प्रोजेक्टसाठी एका व्यक्तीला ६५ हजार कोटी रुपये दिले़ या कंपनीच्या गाड्या कुठेच दिसत नाहीत़ मात्र दुसरीकडे शेतकरी अडचणीत असताना कवडीही मिळत नाही.काँग्रेसच्या योजनाच भाजपा आपल्या नावावर खपवीत आहे़ जीएसटीचा गवगवा होत आहे़ पण जीएसटी आम्हीच आणली. १८ टक्केपेक्षा जास्त कर नसावा, अशी आमची भूमिका होती़ या सरकारने हा टॅक्स २८ टक्क्यांवर नेला असून ५ प्रकारे करवसुली करून सामान्यांना अडचणीत आणले आहे़ नोटाबंदीचा फुगाही फुटला आहे. एक वर्षानंतर ९९ टक्के पैसे रिझर्व्ह बँकेकडे परत येत असतील तर काळा पैसा गेला कुठे, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात शेतकºयांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेताना शेतकºयांची जात का विचारली जात आहे, असा सवाल करून देशात काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहिलेली दिसेल, असा विश्वासही खा. गांधी यांनी व्यक्त केला़

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी