शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सत्तेसाठी भाजपाकडून जाती-धर्मात तेढ , राहुल गांधी यांचा हल्लाबोल; नांदेड, परभणीत काँग्रेसने केले जोरदार शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 05:03 IST

देशात जातीय विष पेरले जात असून, हरयाणात जाटविरोधी इतर तर महाराष्ट्रात मराठाविरोधी अमराठा असा वाद पेटवला जात आहे़

नांदेड/परभणी : देशात जातीय विष पेरले जात असून, हरयाणात जाटविरोधी इतर तर महाराष्ट्रात मराठाविरोधी अमराठा असा वाद पेटवला जात आहे़ सत्तेसाठी भाजपा द्वेष पेरत असून त्यापासून सावध राहा, असा घणाघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड व परभणी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी कर्जमाफी आदी मुद्द्यांवरून त्यांनी भाजपा व मोदी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून राज्यात आणि देशात एनडीएचे सरकार आहे़ या काळात महाराष्ट्रात तब्बल ९ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली आहे़ गुजरातमध्ये नॅनो प्रोजेक्टसाठी एका व्यक्तीला ६५ हजार कोटी रुपये दिले़ या कंपनीच्या गाड्या कुठेच दिसत नाहीत़ मात्र दुसरीकडे शेतकरी अडचणीत असताना कवडीही मिळत नाही.काँग्रेसच्या योजनाच भाजपा आपल्या नावावर खपवीत आहे़ जीएसटीचा गवगवा होत आहे़ पण जीएसटी आम्हीच आणली. १८ टक्केपेक्षा जास्त कर नसावा, अशी आमची भूमिका होती़ या सरकारने हा टॅक्स २८ टक्क्यांवर नेला असून ५ प्रकारे करवसुली करून सामान्यांना अडचणीत आणले आहे़ नोटाबंदीचा फुगाही फुटला आहे. एक वर्षानंतर ९९ टक्के पैसे रिझर्व्ह बँकेकडे परत येत असतील तर काळा पैसा गेला कुठे, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात शेतकºयांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेताना शेतकºयांची जात का विचारली जात आहे, असा सवाल करून देशात काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहिलेली दिसेल, असा विश्वासही खा. गांधी यांनी व्यक्त केला़

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी