शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींना देणार - राहुल गांधी

By admin | Updated: November 16, 2016 11:53 IST

पंतप्रधान मोदी लोकांच्या खिशातून पैसे काढून उद्योगपतीनाा देणार आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी केली.

ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला आणि सर्वसामान्यांना रांगेत उभं केलं. मात्र ज्यांच्याकडे हजारो कोटी रुपये पडले आहेत, अशी एकतरी व्यक्ती बँकेच्या रांगेत उभी दिसते का असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी विचारला. तुमच्या (लोकांच्या) खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींना देणार आहेत' असा आरोप करत राहुल यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली. भिवंडी येथील सभेत ते बोलत होते. 
लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील एका सभेदरम्यान महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात खटला सुरू होता. मात्र बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राहुल यांना जामीन मंजूर केला असून या खटल्याची पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे. या निर्णयानंतर राहुल यांनी भिवंडी कोर्टाबाहेरच सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. 
' मी ही लढाई लढू शकतोय याचा मला खूप आनंद आहे. महात्मा गांधींच्या विचारांसाठी मी ही लढाई लढतोय. जी व्यक्ती कणखरपणे उभी राहू शकते, त्या व्यक्तीला कोणीच गुलाम बनवू सकत नाही, असे गांधीजी म्हणाले होते ' असे राहुल यांनी यावेळी सांगितले. 'पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पैसे बदलून घेण्यासाठी आठवड्याभरापासून नागरिक  तासनतास बँकेच्या रांगेत उभे राहताना दिसत आहे. मात्र त्यामध्ये एकतरी श्रीमंत व्यक्ती दिसते का? असा सवाल राहुल यांनी विचारला. ' तुम्ही रांगेत उभे राहून त्रासलेले असताना मोदी कधी हसत आहेत, तर कधी रडत आहेत. सामान्य लोकांच्या खिशातून पैसे काढून या उद्योगपतींना दिले जातील, उद्योगपतींची कर्जे माफ करण्यासाठी सामान्य जनतेचे पैसे वापरले जाणार आहेत' अशी टीका त्यांनी केली.