नागपूर : भूसंपादन विधेयक कसे शेतकरी विरोधी आहे व मोदी सरकार हे ‘कॉर्पोरेट’धार्जिणे कसे आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरत आहेत. यासाठी ‘किसान पदयात्रा’ काढण्यात येणार असून, याची सुरुवात ते विदर्भातून करणार आहेत. या पदयात्रेसाठी राहुल गांधी यांचे २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता नागपुरात आगमन होणार आहे. ३० एप्रिल रोजी ते अमरावती येथे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांचे दिल्ली येथून नागपुरात विमानाने आगमन झाल्यानंतर विमानतळावरून कडेकोट सुरक्षेत त्यांचा ताफा रविभवनला पोहोचेल. रविभवन येथे त्यांचा मुक्काम असेल. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ते अमरावतीसाठी रवाना होतील. ते हेलिकॉप्टरने जातील की रस्तामार्गे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे अमरावती येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अद्याप याबाबत कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत. नागपूर शहर पदाधिकाऱ्यांना मात्र प्रदेश काँग्रेसकडून राहुल गांधी २९ एप्रिल२ रोजी रात्री नागपुरात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दिग्विजययांचा चौहान यांच्यावर प्रतिहल्लामध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांच्यात ‘व्यापम’ घोटाळ्यावरून भडकलेले वाक्युद्ध अधिक तीव्र झाले. चौहान यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यावरून दिग्विजय यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला आहे.
राहुल गांधी २९ एप्रिल रोजी विदर्भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 01:23 IST