शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

एकही आश्वासन पूर्ण न करणारे सरकार- राधाकृष्ण विखे-पाटील

By admin | Updated: July 15, 2016 20:39 IST

नवनवीन आश्वासने देऊन एकापेक्षा एक लोकप्रिय घोषणा करत असले तरी अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पाळलेले नाही

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 15 - राज्यातील फडणवीस सरकार दररोज नवनवीन आश्वासने देऊन एकापेक्षा एक लोकप्रिय घोषणा करत असले तरी अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पाळलेले नाही. पंढरपूरसाठी नमामि चंद्रभागा विकास प्राधिकरणांतर्गत अनेकदा त्यांनी शेकडो कोटीच्या घोषणा केल्या. मात्र निधीची वानवा असल्याने ती कामे पूर्ण होत नाहीत. अशा सरकारला पावसाळी अधिवेशनात घेरणार असल्याची घोषणा विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.पंढरपूर आषाढी महापूजेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पंढरपूरला आले होते. कॉँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भारत भालके, उल्हास पवार, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे आदी उपस्थित होते. सध्या राज्यात भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्हे दुष्काळाने उद्ध्वस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी, फळबाग अनुदान आदी प्रकारच्या मदतीत सरकारने सरसकट शेतकऱ्यांना करणे गरजेचे होते. मात्र हे सरकार झोपेचे सोंग घेत असून निम्म्या शेतकऱ्यांना लाभ तर अर्धे शेतकरी उपाशी असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे.पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ व राज्यातील अन्य काही भागात दमदार पाऊस झाला आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे होते. मात्र त्याठिकाणी बियाणे व खतांचा काळाबाजार सुरू आहे. याकडेही सरकारचे दुर्लक्ष आहे. सध्याच्या फडणवीस सरकारमध्ये भ्रष्टाचारात गुंतलेले अनेक मंत्री आहेत. पंकजा मुंढे, जयकुमार रावळ, निलंगेकर आदी मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काहींची सीबीआय चौकशी सुरू आहे, तरीही त्यांना मंत्रीमंडळात स्थान कसे दिले जाते, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले पाहिजे. या सरकारवर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढत त्यांच्या काही घोषणा रद्द करण्यास भाग पाडले आहे. तरीही ते घोषणा करण्याचे थांबत नाहीत. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टिकाही विरोधीपक्ष नेते विखे-पाटील यांनी केली.-----------------------------भ्रष्टाचाराचे प्रदर्शन भरविणारफडणवीस सरकारमधील जून्या मंत्र्यांनी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे. त्याचे सविस्तर पुरावे आपल्याकडे आहेत. तर नवीन समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांनीही मंत्रीमंडळात येण्यापूर्वीच भ्रष्टाचार केला आहे. त्याचेही पुरावे आपल्याकडे आहेत. त्याचे पुरावे राज्य सरकारला वेळोवेळी देऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी अशा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे एक प्रदर्शन आपण भरविणार आहोत. या प्रदर्शनात या मंत्र्यांच्या विरोधातील सर्व पुरावे, जनतेसाठी खुले ठेवणार आहोत, अशी माहितीही विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.---------------------------पंढरपूरसाठी केलेल्या घोषणा फसव्यापंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सर्व कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली. त्यासाठी अनेकदा शेकडो कोटींच्या घोषणा केल्या. आता नमामि चंद्रभागा, तुळशी वृंदावनसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपुरात येऊन केल्या. मात्र यामधील किती योजनांना सरकारने भरीव निधी उपलब्ध केला, हे सांगणे सरकारला शक्य नाही. यासारख्या अनेक घोषणा करून फडणवीस सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंढरपूरसाठी भविष्यात भरीव निधीची उपलब्धता करावी व सर्व कामे मार्गी लागावीत, यासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.