शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

एकही आश्वासन पूर्ण न करणारे सरकार- राधाकृष्ण विखे-पाटील

By admin | Updated: July 15, 2016 20:39 IST

नवनवीन आश्वासने देऊन एकापेक्षा एक लोकप्रिय घोषणा करत असले तरी अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पाळलेले नाही

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 15 - राज्यातील फडणवीस सरकार दररोज नवनवीन आश्वासने देऊन एकापेक्षा एक लोकप्रिय घोषणा करत असले तरी अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पाळलेले नाही. पंढरपूरसाठी नमामि चंद्रभागा विकास प्राधिकरणांतर्गत अनेकदा त्यांनी शेकडो कोटीच्या घोषणा केल्या. मात्र निधीची वानवा असल्याने ती कामे पूर्ण होत नाहीत. अशा सरकारला पावसाळी अधिवेशनात घेरणार असल्याची घोषणा विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.पंढरपूर आषाढी महापूजेसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील पंढरपूरला आले होते. कॉँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. भारत भालके, उल्हास पवार, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे आदी उपस्थित होते. सध्या राज्यात भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्हे दुष्काळाने उद्ध्वस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी, फळबाग अनुदान आदी प्रकारच्या मदतीत सरकारने सरसकट शेतकऱ्यांना करणे गरजेचे होते. मात्र हे सरकार झोपेचे सोंग घेत असून निम्म्या शेतकऱ्यांना लाभ तर अर्धे शेतकरी उपाशी असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे.पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ व राज्यातील अन्य काही भागात दमदार पाऊस झाला आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते मुबलक प्रमाणात मिळणे गरजेचे होते. मात्र त्याठिकाणी बियाणे व खतांचा काळाबाजार सुरू आहे. याकडेही सरकारचे दुर्लक्ष आहे. सध्याच्या फडणवीस सरकारमध्ये भ्रष्टाचारात गुंतलेले अनेक मंत्री आहेत. पंकजा मुंढे, जयकुमार रावळ, निलंगेकर आदी मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काहींची सीबीआय चौकशी सुरू आहे, तरीही त्यांना मंत्रीमंडळात स्थान कसे दिले जाते, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले पाहिजे. या सरकारवर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढत त्यांच्या काही घोषणा रद्द करण्यास भाग पाडले आहे. तरीही ते घोषणा करण्याचे थांबत नाहीत. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टिकाही विरोधीपक्ष नेते विखे-पाटील यांनी केली.-----------------------------भ्रष्टाचाराचे प्रदर्शन भरविणारफडणवीस सरकारमधील जून्या मंत्र्यांनी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे. त्याचे सविस्तर पुरावे आपल्याकडे आहेत. तर नवीन समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांनीही मंत्रीमंडळात येण्यापूर्वीच भ्रष्टाचार केला आहे. त्याचेही पुरावे आपल्याकडे आहेत. त्याचे पुरावे राज्य सरकारला वेळोवेळी देऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी अशा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे एक प्रदर्शन आपण भरविणार आहोत. या प्रदर्शनात या मंत्र्यांच्या विरोधातील सर्व पुरावे, जनतेसाठी खुले ठेवणार आहोत, अशी माहितीही विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.---------------------------पंढरपूरसाठी केलेल्या घोषणा फसव्यापंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सर्व कामे लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली. त्यासाठी अनेकदा शेकडो कोटींच्या घोषणा केल्या. आता नमामि चंद्रभागा, तुळशी वृंदावनसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपुरात येऊन केल्या. मात्र यामधील किती योजनांना सरकारने भरीव निधी उपलब्ध केला, हे सांगणे सरकारला शक्य नाही. यासारख्या अनेक घोषणा करून फडणवीस सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. पंढरपूरसाठी भविष्यात भरीव निधीची उपलब्धता करावी व सर्व कामे मार्गी लागावीत, यासाठी विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.