शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

उल्हासनगर महासभेत राडा

By admin | Updated: January 9, 2015 22:57 IST

महापालिका महासभेत अशासकीय प्रस्तावाद्वारे अधिकाऱ्याला उपायुक्तपदी बढती देण्यावरून महासभेत प्रचंड राडा झाला

प्रकाश वराडकर- रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागणाऱ्या वाढीव जमिनीच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी दोन्ही जिल्ह्यात १५७२ हेक्टर्स जमिनीची आवश्यकता असून, सध्याच्या महामार्गाची ७९९.४९ हेक्टर्स जागा शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे चौपदरीकरणासाठी आणखी ७७३ हेक्टर्स जमिनीचे संपादन केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभागाच्या सुत्रांनी दिली. महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम १२ डिसेंबर २०१४पासून राष्ट्रीय महामार्ग विभाग व भूमी अभिलेखतर्फे सुरू करण्यात आले आहे. मुंबई - गोवा महामार्गातील २०६.३२ किलोमीटर्सचा रस्ता रत्नागिरी जिल्ह्यात आहे. या चौपदरीकरणासाठी इंदापूर ते खवटी -ओझरखोल, ओझरखोल ते राजापूर, राजापूर ते झाराप असे टप्पे ठरविण्यात आले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील मुुंबई - गोवा महामार्गावर मोठे २९, तर छोटे ५८ पूल उभारण्यात येणार आहेत. कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात १५ मोठे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपरी होणार आहेत, तर दोन नवीन पूल चारपदरी होणार आहेत. ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात चार मोठे पूल असून, त्यातील एक नवीन चारपदरी, तर तीन नवीन दुपदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात १० मोठे पूल असून, हे सर्व चारपदरी होणार आहेत. हे सर्व मोठे पूल ३० मीटर्सपेक्षा अधिक लांबीचे आहेत.३० मीटरपेक्षा कमी लांबीचे ५८ पूल दोन्ही जिल्ह्यात होणार असून, कशेडी ते ओझरखोल या पहिल्या टप्प्यात असे १५ छोटे पूल असून, त्यातील १३ नवीन दुपदरी आणि २ नवीन चार पदरी पुलांचा समावेश आहे.ओझरखोल ते राजापूर या दुसऱ्या टप्प्यात १७ छोटे पूल असून, १२ नवीन चारपदरी, तर पाच नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. राजापूर ते झाराप या तिसऱ्या टप्प्यात २६ छोटे पूल असून, १२ नवीन चार पदरी, १४ नवीन दोन पदरी पुलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. (प्रतिनिधी)मोजणीचे काम सुरू...गेल्या १५ दिवसांपासून महामार्ग चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या वाढीव जागेच्या मोजणीचे काम सुरु झाले आहे. मात्र, कोकणातील अनुभवानुसार मोजणी करणाऱ्यांना विरोधाची झळ गेल्या १५ दिवसातच सोसावी लागली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून महामार्ग चौपदरीकरणाचा आराखडा आल्याने अनेक वळणे सरळ करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन संपादनात काही ठिकाणी एकाच बाजूची जागा जाणार आहे. त्याबाबत संबंधित जमीन मालकांकडून काही आक्षेप आल्याने पाली, मराठेवाडी, खानू व अन्य काही भागातील मोजणीचे काम पंचयादी घालून तहकूब ठेवण्यात आले आहे. जमीन मालकांच्या सूचना केंद्र सरकारकडे पाठविल्या जाणार आहेत.