शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काँग्रेसमध्ये राडा, १५ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म

By admin | Updated: February 3, 2017 22:03 IST

तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसल्यानंतरही नेत्यांना मर्जीतील सर्वांनाच तिकीट मिळवून देण्यात यश आले नाही.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसल्यानंतरही नेत्यांना मर्जीतील सर्वांनाच तिकीट मिळवून देण्यात यश आले नाही. काँग्रेसच्या तिकीट वाटपाचा गोंधळ या वेळी कायम राहिला. सुमारे १८ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले. तिकीट कटल्यांनी समर्थकांसह काँग्रेस नेत्यांविरोधात रोष व्यक्त केला. उत्तर नागपुरात अभिजित वंजारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, रेखा बाराहाते, उज्ज्वला बनकर, तानाजी वनवे, हर्षला साबळे आदींनी पुन्हा तिकीट मिळाले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनाही उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नगरसेवकांना धक्काही बसला आहे. नगरसेवक दीपक कापसे, किशोर डोरले, अरुण डवरे, देवा उसरे, नयना झाडे, शीला मोहोड, विद्या लोणारे, कुमोदिनी कैकाडे, अशरफुनिसा अंसारी या नगरसेवकांचे तिकीट कटले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या शीतल घरत, अपक्ष नगरसेवक किशोर डोरले व मनसेतून आलेले श्रावण खापेकर यांनाही उमेदवारी मिळू शकली नाही. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक असलेले दीपक कापसे यांचे तिकीट कटले. नगरसेवक अरुण डवरे यांना प्रभाग १० व ११ पैकी एकाही प्रभागातून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही प्रभागात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. प्रभाग ३२ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका नयना झाडे यांचे तिकीट कटले. त्यांच्या जागी नम्रता देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. नाराज झालेल्या झाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून, निवडणूक लढण्यासाठी लोकांचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी तिकीट कापून अन्याय केला. नेत्यांनी पुत्रप्रेमासाठी माझे तिकीट कापले, असा आरोप त्यांनी केला. १८ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले. नितीन राऊत यांच्या उमेदवारांनी प्रारंभी ए-बी फॉर्म घेण्यास नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या उमेदवारांना वेळेवर ए-बी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय यादीत एक नाव असताना काही जागांवर दुसऱ्याच उमेदवाराला ए-बी फॉर्म दिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अर्जांच्या छाननीनंतरच अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट होईल. याबाबत विचारणा केली असता शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, प्रभागात चार उमेदवारांना एकत्र लढायचे आहे. वेळेवर एखाद्या उमेदवाराने माघार घेतली किंवा त्रुटीमुळे अर्ज रद्द झाला तर जागा रिकामी जाऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार काही जागांवर दोन नंबर टाकून ए-बी- फॉर्म देण्यात आले आहेत. पहिला अर्ज कायम राहिला तर दुसरा अर्ज आपोआप रद्द होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.