शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये राडा, १५ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म

By admin | Updated: February 3, 2017 22:03 IST

तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसल्यानंतरही नेत्यांना मर्जीतील सर्वांनाच तिकीट मिळवून देण्यात यश आले नाही.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसल्यानंतरही नेत्यांना मर्जीतील सर्वांनाच तिकीट मिळवून देण्यात यश आले नाही. काँग्रेसच्या तिकीट वाटपाचा गोंधळ या वेळी कायम राहिला. सुमारे १८ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले. तिकीट कटल्यांनी समर्थकांसह काँग्रेस नेत्यांविरोधात रोष व्यक्त केला. उत्तर नागपुरात अभिजित वंजारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, रेखा बाराहाते, उज्ज्वला बनकर, तानाजी वनवे, हर्षला साबळे आदींनी पुन्हा तिकीट मिळाले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनाही उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नगरसेवकांना धक्काही बसला आहे. नगरसेवक दीपक कापसे, किशोर डोरले, अरुण डवरे, देवा उसरे, नयना झाडे, शीला मोहोड, विद्या लोणारे, कुमोदिनी कैकाडे, अशरफुनिसा अंसारी या नगरसेवकांचे तिकीट कटले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या शीतल घरत, अपक्ष नगरसेवक किशोर डोरले व मनसेतून आलेले श्रावण खापेकर यांनाही उमेदवारी मिळू शकली नाही. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक असलेले दीपक कापसे यांचे तिकीट कटले. नगरसेवक अरुण डवरे यांना प्रभाग १० व ११ पैकी एकाही प्रभागातून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही प्रभागात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. प्रभाग ३२ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका नयना झाडे यांचे तिकीट कटले. त्यांच्या जागी नम्रता देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. नाराज झालेल्या झाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून, निवडणूक लढण्यासाठी लोकांचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षश्रेष्ठींनी तिकीट कापून अन्याय केला. नेत्यांनी पुत्रप्रेमासाठी माझे तिकीट कापले, असा आरोप त्यांनी केला. १८ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले. नितीन राऊत यांच्या उमेदवारांनी प्रारंभी ए-बी फॉर्म घेण्यास नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या उमेदवारांना वेळेवर ए-बी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय यादीत एक नाव असताना काही जागांवर दुसऱ्याच उमेदवाराला ए-बी फॉर्म दिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अर्जांच्या छाननीनंतरच अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट होईल. याबाबत विचारणा केली असता शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, प्रभागात चार उमेदवारांना एकत्र लढायचे आहे. वेळेवर एखाद्या उमेदवाराने माघार घेतली किंवा त्रुटीमुळे अर्ज रद्द झाला तर जागा रिकामी जाऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार काही जागांवर दोन नंबर टाकून ए-बी- फॉर्म देण्यात आले आहेत. पहिला अर्ज कायम राहिला तर दुसरा अर्ज आपोआप रद्द होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.