शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार

By admin | Updated: June 10, 2014 01:05 IST

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़

उद्धव ठाकरे : फोडला प्रचाराचा नारळमुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़इंडियन मर्चन्टस् चेम्बरच्या वतीने विकास महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन चर्चगेट येथील मुख्य इमारतीत करण्यात आले होते़ त्यावेळी उद्धव यांनी ही घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला़ते म्हणाले, रेसकोर्सच्या कराराची मुदत आता संपली आहे़ त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही हा भूखंड ताब्यात घेऊ़ येथे मुंबईकरांसाठी भव्य उद्यान उभारू . मुंबईला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी हे उद्यान एक आकर्षण ठरेल. सध्या येथे अस्तित्वात असलेला घोडे बाजार आम्ही मुंबईबाहेर हलवू़ ज्यांना शौक पूर्ण करायचे असतील ते कोठेही जाऊन करतील़ मुंबईच्या मध्यवर्ती असलेला हा सव्वा दोनशे एकर भूखंड केवळ मुंबईकरांसाठीच वापरला जाईल़ येथे टेलबलँड असल्याने उद्यान उभारताना फारसा खर्च येणार नाही़ येथे नवीन झाडे लावली जातील़ मुंबईकर येथे हक्काने येथील, असेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले़दरम्यान, रेसकार्ससोबत मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीलाही उद्धव यांनी यावेळी सागरी मार्गाचा पर्याय सुचवला़ ते म्हणाले, मुंबईत इमारतींना एफएसआय मिळतो़ पण रस्त्यांना नाही़ आता मुंबईतील रस्ते वाढवणे शक्य नाही़ त्यामुळे सागरी किनार्‍यांकडून मुक्त मार्ग बांधणे हा यावर उत्तम तोडगा आहे़ या मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीची कोंडी निश्चितच कमी होईल़ मात्र हा मार्ग तयार करत असताना कोळी बांधवांच्या रोजगारावर किंवा त्यांच्या घरांवर कोणतीही गदा येणार नाही याची काळजी घेतली जाईल़महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलताना त्यांनी शिक्षणावर अधिक जोर दिला़ ते म्हणाले, मुंबईत आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले़ याने चारशे शाळा जोडल्या़ या चारशे शाळांतील विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच शिक्षकाला शिकवणे शक्य झाले़ राज्यात महायुतीची सत्ता आल्यास अशाच प्रकारचे व्हर्च्युल क्लास रूम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करू़ कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शहरात येऊन चांगले शिक्षण घेणे परवडत नाही़ पण या माध्यमातून आम्ही उत्तम शिक्षणाची दारे ग्रामीण भागासाठीही खुली करू़यावेळी उद्धव यांनी उद्योजकांनाही महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले़ ते म्हणाले, याआधीचे केंद्रातील सरकार हे उद्योजकांना पोषक नव्हते़ मात्र आताचे सरकार हे उद्योजकांना पाठबळ देणारे आहे़ महाराष्ट्रातही महायुतीची सत्ता आल्यास आम्ही उद्योजकांना नक्कीच सहकार्य करू़ कारण आमचे सरकार हे आमचे नसून, आपले सरकार असणार आहे़ तेव्हा उद्योजकांनाही महायुतीला तेवढेच सहकार्य करावे़ कारण माझा उद्योगांना विरोध नाही़ मी मुख्यमंत्री व्हावे, अशी तुमची असेल़ पण आता मी याबाबत काहीच बोलत नाही़ केवळ तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असेही उद्धव यांनी उद्योजकांना सांगितले़यावेळी उद्धव यांनी सत्ता आल्यानंतर एक लाख पोलीस भरती, जलदगती न्यायालये, ग्राहक हिताचे रक्षण, २५ हजार मेगावॉट वीज उत्पादन अशा घोषणा केल्या़जैतापूरला विरोध कायमजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला आमचा विरोध असून तो नवनिर्वाचीत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कळविण्यात आला आहे़ त्यांनीही या प्रकरणाचा आढावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केल्याचे उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़