शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करणार

By admin | Updated: June 10, 2014 01:05 IST

राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़

उद्धव ठाकरे : फोडला प्रचाराचा नारळमुंबई : राज्यात महायुतीची सत्ता आल्यास महालक्ष्मी येथील रेसकोर्स मुंबईतून हद्दपार करू व येथे मुंबईकरांसठी भव्य उद्यान उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली़इंडियन मर्चन्टस् चेम्बरच्या वतीने विकास महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन चर्चगेट येथील मुख्य इमारतीत करण्यात आले होते़ त्यावेळी उद्धव यांनी ही घोषणा करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला़ते म्हणाले, रेसकोर्सच्या कराराची मुदत आता संपली आहे़ त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही हा भूखंड ताब्यात घेऊ़ येथे मुंबईकरांसाठी भव्य उद्यान उभारू . मुंबईला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी हे उद्यान एक आकर्षण ठरेल. सध्या येथे अस्तित्वात असलेला घोडे बाजार आम्ही मुंबईबाहेर हलवू़ ज्यांना शौक पूर्ण करायचे असतील ते कोठेही जाऊन करतील़ मुंबईच्या मध्यवर्ती असलेला हा सव्वा दोनशे एकर भूखंड केवळ मुंबईकरांसाठीच वापरला जाईल़ येथे टेलबलँड असल्याने उद्यान उभारताना फारसा खर्च येणार नाही़ येथे नवीन झाडे लावली जातील़ मुंबईकर येथे हक्काने येथील, असेही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केले़दरम्यान, रेसकार्ससोबत मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीलाही उद्धव यांनी यावेळी सागरी मार्गाचा पर्याय सुचवला़ ते म्हणाले, मुंबईत इमारतींना एफएसआय मिळतो़ पण रस्त्यांना नाही़ आता मुंबईतील रस्ते वाढवणे शक्य नाही़ त्यामुळे सागरी किनार्‍यांकडून मुक्त मार्ग बांधणे हा यावर उत्तम तोडगा आहे़ या मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीची कोंडी निश्चितच कमी होईल़ मात्र हा मार्ग तयार करत असताना कोळी बांधवांच्या रोजगारावर किंवा त्यांच्या घरांवर कोणतीही गदा येणार नाही याची काळजी घेतली जाईल़महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलताना त्यांनी शिक्षणावर अधिक जोर दिला़ ते म्हणाले, मुंबईत आम्ही व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले़ याने चारशे शाळा जोडल्या़ या चारशे शाळांतील विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच शिक्षकाला शिकवणे शक्य झाले़ राज्यात महायुतीची सत्ता आल्यास अशाच प्रकारचे व्हर्च्युल क्लास रूम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करू़ कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शहरात येऊन चांगले शिक्षण घेणे परवडत नाही़ पण या माध्यमातून आम्ही उत्तम शिक्षणाची दारे ग्रामीण भागासाठीही खुली करू़यावेळी उद्धव यांनी उद्योजकांनाही महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले़ ते म्हणाले, याआधीचे केंद्रातील सरकार हे उद्योजकांना पोषक नव्हते़ मात्र आताचे सरकार हे उद्योजकांना पाठबळ देणारे आहे़ महाराष्ट्रातही महायुतीची सत्ता आल्यास आम्ही उद्योजकांना नक्कीच सहकार्य करू़ कारण आमचे सरकार हे आमचे नसून, आपले सरकार असणार आहे़ तेव्हा उद्योजकांनाही महायुतीला तेवढेच सहकार्य करावे़ कारण माझा उद्योगांना विरोध नाही़ मी मुख्यमंत्री व्हावे, अशी तुमची असेल़ पण आता मी याबाबत काहीच बोलत नाही़ केवळ तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असेही उद्धव यांनी उद्योजकांना सांगितले़यावेळी उद्धव यांनी सत्ता आल्यानंतर एक लाख पोलीस भरती, जलदगती न्यायालये, ग्राहक हिताचे रक्षण, २५ हजार मेगावॉट वीज उत्पादन अशा घोषणा केल्या़जैतापूरला विरोध कायमजैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला आमचा विरोध असून तो नवनिर्वाचीत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कळविण्यात आला आहे़ त्यांनीही या प्रकरणाचा आढावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केल्याचे उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़