शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ऐरोली मतदारसंघात युतीमध्येच रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:11 IST

आघाडीमध्ये उमेदवाराचा शोध : विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे बदलली समीकरणे

- नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिलेल्या ऐरोली मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असून युतीच्या निर्णयावरच येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. युतीमध्ये चुरस असताना काँगे्रस व राष्ट्रवादी मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये ऐरोली मतदारसंघाची निर्मिती झाली. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर संदीप नाईक या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. गत पाच वर्षांमध्ये सातत्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलत राहिली आहेत. २०१५ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली. भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवकही या मतदारसंघात निवडून आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन कामगार वर्गाला भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधान परिषदेचे सदस्यपद देण्यात आले. शिवसेनेचे विजय चौगुले यांना वराड समाज समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांना या मतदारसंघातून जवळपास ४४ हजार मतांची आघाडी मिळाली. या आघाडीमुळे युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदार संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघातील सर्व समीकरणेच बदलून गेली आहेत.नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितीही वाढली आहे. परंतु त्या तुलनेमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवारांमध्ये फारशी चुरस दिसत नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता फक्त दोन नगरसेवक उरले आहेत.

यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. आघाडी झाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याने काँग्रेसने अद्याप फारशी मोर्चेबांधणी सुरू केलेली नाही. युती होणार की नाही यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत. युती झाली तर हा मतदारसंघ भाजपकडे जाऊन संदीप नाईक उमेदवार असतील. युती झाली नाही तर शिवसेनेकडून महापालिकेमधील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम. के. मढवी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या रमाकांत म्हात्रे यांचेही नाव चर्चेत आहे.राजकीय उलथापालथऐरोली मतदारसंघात पाच वर्षे सातत्याने राजकीय बदल घडत आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपची फारशी संघटनात्मक बांधणी या मतदारसंघात नव्हती. पक्षाचे फक्त दोन नगरसेवक होते. परंतु सद्यस्थितीमध्ये विद्यमान आमदार भाजपमध्ये आले आहेत. भाजपचे विधान परिषद सदस्य रमेश पाटील याच मतदारसंघात वास्तव्यास आहेत. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचीही संघटनात्मक ताकद या मतदारसंघात आहे. यामुळे युतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान आमदार व पदाधिकारी भाजपत गेल्यामुळे राष्ट्रवादीची स्थिती बिकट झाली आहे. सद्यस्थितीमध्ये दोन नगरसेवक एवढीच त्यांची ताकद असून काँगे्रसचे या मतदारसंघात ३ नगरसेवक आहेत. दहा वर्षे या मतदारसंघात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला सक्षम उमेदवार शोधावा लागत आहे.मागोवा मागील निवडणुकीचाऐरोली मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार संदीप नाईक यांना ७६,४४४ मते मिळाली होती. शिवसेनेचे विजय चौगुले यांना ६७ हजार ७१९ मते मिळाली व भाजपचे उमेदवार वैभव नाईक यांना ४६ हजार ४०५ मते मिळाली होती. ८७२५ मतांनी संदीप नाईक विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून ४४ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.