शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

ऐरोली मतदारसंघात युतीमध्येच रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:11 IST

आघाडीमध्ये उमेदवाराचा शोध : विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे बदलली समीकरणे

- नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिलेल्या ऐरोली मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असून युतीच्या निर्णयावरच येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. युतीमध्ये चुरस असताना काँगे्रस व राष्ट्रवादी मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये ऐरोली मतदारसंघाची निर्मिती झाली. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर संदीप नाईक या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. गत पाच वर्षांमध्ये सातत्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलत राहिली आहेत. २०१५ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली. भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवकही या मतदारसंघात निवडून आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन कामगार वर्गाला भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधान परिषदेचे सदस्यपद देण्यात आले. शिवसेनेचे विजय चौगुले यांना वराड समाज समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांना या मतदारसंघातून जवळपास ४४ हजार मतांची आघाडी मिळाली. या आघाडीमुळे युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदार संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघातील सर्व समीकरणेच बदलून गेली आहेत.नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितीही वाढली आहे. परंतु त्या तुलनेमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवारांमध्ये फारशी चुरस दिसत नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता फक्त दोन नगरसेवक उरले आहेत.

यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. आघाडी झाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याने काँग्रेसने अद्याप फारशी मोर्चेबांधणी सुरू केलेली नाही. युती होणार की नाही यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत. युती झाली तर हा मतदारसंघ भाजपकडे जाऊन संदीप नाईक उमेदवार असतील. युती झाली नाही तर शिवसेनेकडून महापालिकेमधील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम. के. मढवी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या रमाकांत म्हात्रे यांचेही नाव चर्चेत आहे.राजकीय उलथापालथऐरोली मतदारसंघात पाच वर्षे सातत्याने राजकीय बदल घडत आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपची फारशी संघटनात्मक बांधणी या मतदारसंघात नव्हती. पक्षाचे फक्त दोन नगरसेवक होते. परंतु सद्यस्थितीमध्ये विद्यमान आमदार भाजपमध्ये आले आहेत. भाजपचे विधान परिषद सदस्य रमेश पाटील याच मतदारसंघात वास्तव्यास आहेत. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचीही संघटनात्मक ताकद या मतदारसंघात आहे. यामुळे युतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान आमदार व पदाधिकारी भाजपत गेल्यामुळे राष्ट्रवादीची स्थिती बिकट झाली आहे. सद्यस्थितीमध्ये दोन नगरसेवक एवढीच त्यांची ताकद असून काँगे्रसचे या मतदारसंघात ३ नगरसेवक आहेत. दहा वर्षे या मतदारसंघात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला सक्षम उमेदवार शोधावा लागत आहे.मागोवा मागील निवडणुकीचाऐरोली मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार संदीप नाईक यांना ७६,४४४ मते मिळाली होती. शिवसेनेचे विजय चौगुले यांना ६७ हजार ७१९ मते मिळाली व भाजपचे उमेदवार वैभव नाईक यांना ४६ हजार ४०५ मते मिळाली होती. ८७२५ मतांनी संदीप नाईक विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून ४४ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.